शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

Chandrakant Patil: फडणवीस सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या बँकेबाहेर रांगा; आता केंद्र सरकार सोडून त्यांना कुठेही पैसे मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 4:13 PM

२०१४ ते २०१९ या काळात शेतकरी बँकेच्या दारावर रांगा लावून उभे असायचे. कारण त्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारकडून काही ना काही पैसे आलेले असायचे

पुणे : कोव्हीड काळात नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारने २ - २ हजार रुपयांचे तीन इंस्टॉलमेंट भरले आहेत. एकूण ५४ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरले. २०१४ ते २०१९ या काळात शेतकरी बँकेच्या दारावर रांगा लावून उभे असायचे. कारण त्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकारकडून काही ना काही पैसे आलेले असायचे. आता केंद्र सरकारचे पैसे सोडले तर कुठेही पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर टीका केली. 

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची कुठलीच कामे झाली नाहीत. दोन वर्षाच्या काळात सरकारचा पैसे कमवण्याचा धंदा जोरात सुरू आहे. ज्या मुंबई पोलिसांचं नाव जगभरात घेतले जात होतं, त्या मुंबईचे पोलीस आयुक्तच परागंदा होते. मंत्रिमंडळातील एक तृतीयांश गट कुठल्या ना कुठल्या आरोपांनी चर्चेत आहे. सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वच समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या दोन वर्षात सरकारने घेतलेले अनेक निर्णय हायकोर्टात टिकले नाहीत, कोर्टाने त्यांना फटकारले आहे. सरकारच्या दोन वर्षाच्या काळात फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन तर करणारच नाही परंतु निषेध मात्र नक्की करणार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी