शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

खेड तालुक्यात वन्यजीवांकरिता पाण्याच्या टाक्या उभारण्यात शेतक-यांचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 16:49 IST

वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले.

ठळक मुद्देरानमळयातील अभिनव उपक्र, सर्वस्तरातून कौतुक मागील काही वर्षांपासून वन्यप्राणी व माणूस यांच्यातील संघर्ष तीव्र 

पुणे : वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले. याचा परिणाम म्हणजे बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांनी मानवावर हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षात शेकडोहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधाच्या निमित्ताने का होईना मानवी वस्तीत येऊन उपद्रव करु नये, याकरिता आता खेड तालुक्यातील रानमळा गावातील शेतक-यांनी त्यांच्यासाठी डोंगरावरच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. तीन शेतक-यांनी पुढाकार घेवून बांधलेल्या या टाक्याच्या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. खेड तालुक्यातील रानमळा डोंगराळ भाग. याबरोबरच ब-यापैकी बागायती क्षेत्र, यामुळे वन्यप्राण्यांचा वावर तिथे दिसून येतो. ब-याचदा रात्री उशिरा पाणी पिण्याच्या निमित्ताने बिबट्या जवळपासच्या मानवी वस्तीत आल्याचे गावकरी सांगतात. भविष्यात हा धोका टाळुन कुठलीही जीवीतहानी होऊ नये यासाठी आता डोंगरावर तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यावर पाणी पिण्याक रिता मोर, लांडगे, कोल्हे आणि बिबटे येतात. मात्र खासकरुन बिबट्यापासून संरक्षणाकरिता याप्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. बिबट्याने पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत येऊन त्रास देऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मागील दोन वर्षात दहापेक्षा अधिक जनावरांबर बिबट्याचा हल्ला झाला आहे. तसेच परिसरातील माणसांवर हल्ला करुन त्यांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे.  पाण्याच्या टाक्याच्या बांधण्यात बबन खडके, गेणूभाऊ भुजबळ व राजाराम शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच आपल्या खासगी विहीरीतून पाणीपुरवठा देखील केला आहे. तीन टाक्यांपैकी एक टाकी वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून बिबट्यापासून संरक्षण होण्याकरिता पाण्याच्या टाकीचा पर्याय गावक-यांनी निवडला होता. सध्याच्या दोन टाक्यांमध्ये दर दोन दिवसांनंतर विहीरीतून पाईपलाईनव्दारा पाणी सोडले जाते.  

*  मागील काही वर्षांपासून वन्यप्राणी व माणूस यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. टाक्यांच्या माध्यमातून त्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव कसा करायचा याक रिता टाक्यांची कल्पना पुढे आली. सध्या या पाण्याच्या टाक्या केवळ मोर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे यांच्याबरोबरच बिबट्याकरिता मोठा आधार आहे. दोन नव्याने बांधण्यात आलेल्या टाक्या या पाच बाय पाच आकारातील आहेत. वनाधिकारी शुभांगी चव्हाण यांनी देखील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीforestजंगलFarmerशेतकरी