शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

खेड तालुक्यात वन्यजीवांकरिता पाण्याच्या टाक्या उभारण्यात शेतक-यांचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 16:49 IST

वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले.

ठळक मुद्देरानमळयातील अभिनव उपक्र, सर्वस्तरातून कौतुक मागील काही वर्षांपासून वन्यप्राणी व माणूस यांच्यातील संघर्ष तीव्र 

पुणे : वन्यजीवांचा हक्काचा अधिवास माणसाने हिसकावून घेतल्यानंतर त्यांंना अन्नपाण्याकरिता मानवी वस्तीत यावे लागले. याचा परिणाम म्हणजे बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांनी मानवावर हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षात शेकडोहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधाच्या निमित्ताने का होईना मानवी वस्तीत येऊन उपद्रव करु नये, याकरिता आता खेड तालुक्यातील रानमळा गावातील शेतक-यांनी त्यांच्यासाठी डोंगरावरच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. तीन शेतक-यांनी पुढाकार घेवून बांधलेल्या या टाक्याच्या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. खेड तालुक्यातील रानमळा डोंगराळ भाग. याबरोबरच ब-यापैकी बागायती क्षेत्र, यामुळे वन्यप्राण्यांचा वावर तिथे दिसून येतो. ब-याचदा रात्री उशिरा पाणी पिण्याच्या निमित्ताने बिबट्या जवळपासच्या मानवी वस्तीत आल्याचे गावकरी सांगतात. भविष्यात हा धोका टाळुन कुठलीही जीवीतहानी होऊ नये यासाठी आता डोंगरावर तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यावर पाणी पिण्याक रिता मोर, लांडगे, कोल्हे आणि बिबटे येतात. मात्र खासकरुन बिबट्यापासून संरक्षणाकरिता याप्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. बिबट्याने पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत येऊन त्रास देऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मागील दोन वर्षात दहापेक्षा अधिक जनावरांबर बिबट्याचा हल्ला झाला आहे. तसेच परिसरातील माणसांवर हल्ला करुन त्यांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे.  पाण्याच्या टाक्याच्या बांधण्यात बबन खडके, गेणूभाऊ भुजबळ व राजाराम शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच आपल्या खासगी विहीरीतून पाणीपुरवठा देखील केला आहे. तीन टाक्यांपैकी एक टाकी वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून बिबट्यापासून संरक्षण होण्याकरिता पाण्याच्या टाकीचा पर्याय गावक-यांनी निवडला होता. सध्याच्या दोन टाक्यांमध्ये दर दोन दिवसांनंतर विहीरीतून पाईपलाईनव्दारा पाणी सोडले जाते.  

*  मागील काही वर्षांपासून वन्यप्राणी व माणूस यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. टाक्यांच्या माध्यमातून त्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव कसा करायचा याक रिता टाक्यांची कल्पना पुढे आली. सध्या या पाण्याच्या टाक्या केवळ मोर, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे यांच्याबरोबरच बिबट्याकरिता मोठा आधार आहे. दोन नव्याने बांधण्यात आलेल्या टाक्या या पाच बाय पाच आकारातील आहेत. वनाधिकारी शुभांगी चव्हाण यांनी देखील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीforestजंगलFarmerशेतकरी