शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

शेतकरी पतीला विमा योजनेनुसार भरपाई मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 13:22 IST

वाहन अपघातात पत्नीचा झाला होता मृत्यू

ठळक मुद्देग्राहक मंचाचा विमा कंपनीला आदेश तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी

पुणे : अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीला शेतकरी विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केलेल्या तक्रारदार शेतकऱ्याला मंचाने दिलासा दिला. तक्रारदाराला दोन लाख रुपये नुकसान भरपाई सात टक्के व्याज दराने द्यावी. तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.संगीता ज्ञानेश्वर वाघमारे यांचा २० सप्टेंबर २०१६ रोजी अपघात झाला. त्या बसने प्रवास करत असताना वेगाने आलेल्या कंटेनरने बसला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे पती ज्ञानेश्वर प्रभाकर वाघमारे (रा. चांदोली, खेड)  यांनी तलाठ्याकडे विम्याचा दावा आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. विमा कंपनीकडून विम्याचे दोन लाख रुपये १५ टक्के व्याजासह मिळावेत. नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून २५ हजार रुपये मिळावेत, अशी मागणी मंचाकडे दाखल केलेल्या दाव्यात केली होती. मात्र, विमा कंपनीने तक्रारदारांचा तो दावा मंजूर केला नाही किंवा नामंजूर केल्याचे देखील कळवले नाही. तसेच वाघमारे यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. (भाऊसाहेब शिरोळे भवन, चौथा मजला, पी. एम. टी बिल्डिंग, डेक्कन जिमखाना शिवाजीनगर, तालुका कृषी अधिकारी ता. खेड) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तक्रारीत केली होती.तक्रारदाराने दाखल केलेल्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावरुन संगीता वाघमारे या २०१० पासून शेतकरी असल्याचे सिद्ध होते. पोलिसांनी दाखल केलेल्या जबाबानुसार संगीता अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाताच्या पुराव्यासाठी दाखल करावयाच्या कागदपत्रांमध्ये मयत किंवा अपघातग्रस्त शेतकरी यांचा सातबारा उतारा दाखल करावा, अशी प्राथमिक अट असल्याचा शासन निर्णय आहे. संगीता यांचा सातबारा उतारा तक्रारदाराने दाखल केला होता. त्यामुळे संबंधित कागदपत्रे दाखल केली नाहीत या कारणामुळे दावा नाकारणे योग्य होणार नाही, असे मंचाने निकालात नमूद केले आहे. ........नोटीस बजावूनही अधिकारी आले नाहीतयाप्रकरणात विमा कंपनीने लेखी जबाब दाखल केला. मयत व्यक्ती शेतकरी असणे ही विम्याची रक्कम मिळण्यासाठी प्रमुख अट आहे. मयत संगीता या शेतकरी नव्हत्या. विमा कंपनीने तक्रारदारांकडे अनेकदा अनेक कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी विमा कंपनीला कागदपत्रे दिली नाहीत...........मयत संगीता या शेतकरी असल्याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी कंपनीला दिला नाही. त्या विमा योजनेअंतर्गत विमा मिळण्यास पात्र ठरत नाही, असे म्हणणे कंपनीतर्फे जबाबात नमूद केले होते. तर तालुका कृषी अधिकारी नोटीस बजावूनही हजर झाले नाहीत.................

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीDeathमृत्यूCrop Insuranceपीक विमा