शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने नाकारली कर्जमाफी

By admin | Updated: June 16, 2017 04:42 IST

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. याने तमाम शेतकरीवर्ग आनंदी झाला असतानाच सरकारतर्फे करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवासुंदे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. याने तमाम शेतकरीवर्ग आनंदी झाला असतानाच सरकारतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वासुंदे (ता. दौंड) येथील वामनराव शंकर भगत या शेतकऱ्याने ‘आपल्याला कर्जमाफीतून वगळण्यात यावे,’ असे लेखी पत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडे सुपूर्त करून स्वत:हून कर्जमाफी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यातील आणखी एक शेतकरी होण्याचा मान मिळविला आहे.वामनराव भगत यांची वासुंदे (ता. दौंड) येथे वडिलोपार्जित जमीन आहे. ते स्वत: शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सद्य:स्थितीत शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर शासनाने गॅस सबसिडीप्रमाणे जे स्वत:हून कर्ज भरण्यास सक्षम आहेत, त्यांना कर्जमाफी सोडण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देऊन व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या शेतकऱ्याने वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांच्या नावे लेखी पत्र लिहून आपण पीककर्ज भरण्यास सक्षम असल्याने शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीतून आपणास वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे. वामनराव भगत यांच्याकडे ५०,१८५ रुपयांचे पीककर्ज असून, त्यावरील व्याज ८,३४१ असे एकूण कर्ज रक्कम रुपये ५८,५२६ इतकी आहे. या कर्जाची माफी नाकारण्याचे पत्र त्यांनी वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले व सचिव संजय साळवे यांच्याकडे सुपूर्त केले. या वेळी माजी सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच दिलीप जगताप, सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले, दादासाहेब माकर, शहाजी जांबले, प्रभाकर जांबले, मच्छिंद्र जांबले, दिलीप कुंभार, किसन जांबले, दिगांबर हाजबे, सुरेश लोंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.शेतमालाला हमीभाव हवाराज्य शासनाने जरी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आहे, तरीसुद्धा अगदी खेड्यातील गरिबांतील गरीब शेतकऱ्याला त्याचा लाभ व्हावा, हा उद्देश ठेवून व नुकतीच दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही कर्जमाफी नाकारली त्यांची प्रेरणा घेऊन आपण हा कर्जमाफी नाकारण्याचा निर्णय घेतला. परंतु, तळागाळातील शेतकरी जर वाचवायचा असेल, तर शासनाने शेतमालाला हमीभाव मिळवून देणे गरजेचे आहे.- वामनराव भगत,कर्जमाफी नाकारणारे शेतकरी