शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शेतकऱ्याने नाकारली कर्जमाफी

By admin | Updated: June 16, 2017 04:42 IST

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. याने तमाम शेतकरीवर्ग आनंदी झाला असतानाच सरकारतर्फे करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवासुंदे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. याने तमाम शेतकरीवर्ग आनंदी झाला असतानाच सरकारतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वासुंदे (ता. दौंड) येथील वामनराव शंकर भगत या शेतकऱ्याने ‘आपल्याला कर्जमाफीतून वगळण्यात यावे,’ असे लेखी पत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडे सुपूर्त करून स्वत:हून कर्जमाफी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यातील आणखी एक शेतकरी होण्याचा मान मिळविला आहे.वामनराव भगत यांची वासुंदे (ता. दौंड) येथे वडिलोपार्जित जमीन आहे. ते स्वत: शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सद्य:स्थितीत शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर शासनाने गॅस सबसिडीप्रमाणे जे स्वत:हून कर्ज भरण्यास सक्षम आहेत, त्यांना कर्जमाफी सोडण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देऊन व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या शेतकऱ्याने वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांच्या नावे लेखी पत्र लिहून आपण पीककर्ज भरण्यास सक्षम असल्याने शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीतून आपणास वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे. वामनराव भगत यांच्याकडे ५०,१८५ रुपयांचे पीककर्ज असून, त्यावरील व्याज ८,३४१ असे एकूण कर्ज रक्कम रुपये ५८,५२६ इतकी आहे. या कर्जाची माफी नाकारण्याचे पत्र त्यांनी वासुंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले व सचिव संजय साळवे यांच्याकडे सुपूर्त केले. या वेळी माजी सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच दिलीप जगताप, सोसायटीचे चेअरमन उमेश जांबले, दादासाहेब माकर, शहाजी जांबले, प्रभाकर जांबले, मच्छिंद्र जांबले, दिलीप कुंभार, किसन जांबले, दिगांबर हाजबे, सुरेश लोंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.शेतमालाला हमीभाव हवाराज्य शासनाने जरी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आहे, तरीसुद्धा अगदी खेड्यातील गरिबांतील गरीब शेतकऱ्याला त्याचा लाभ व्हावा, हा उद्देश ठेवून व नुकतीच दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही कर्जमाफी नाकारली त्यांची प्रेरणा घेऊन आपण हा कर्जमाफी नाकारण्याचा निर्णय घेतला. परंतु, तळागाळातील शेतकरी जर वाचवायचा असेल, तर शासनाने शेतमालाला हमीभाव मिळवून देणे गरजेचे आहे.- वामनराव भगत,कर्जमाफी नाकारणारे शेतकरी