शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वैरणीचे घटले प्रमाण, नगदी पिकांमुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:46 AM

नगदी पिकांमुळे परिणाम : खरीब, रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र घटले

पुणे : शेतकऱ्यांकडून अधिकाधिक नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असल्याने वैरणपिकांच्या क्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे वैरणक्षेत्रात वाढ करून वैरणीचे उत्पादन वाढविणे, कडबाकुट्टी यंत्राचा वापर करणे, पावसाळ्यात वैरणीचे अतिरिक्त उत्पादन करून मूरघास स्वरूपात साठवण करणे आणि अपारंपरिक वैरणीचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील लागवडयोग्य क्षेत्राचे निवासी क्षेत्रामध्ये रुपांतर होत असल्याने पेरणीक्षेत्र कमी होत आहे. त्याचप्रमाणे शेतकºयांचा कापूस, ऊस, फळझाडे व तेलबिया आदी नगदी पिकांच्या लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यातील काही नगदी पिकांचा वैरणीसाठी उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या आर्थिक पाहणीनुसार राज्यातील प्रमुख पिकांच्या पेरणीक्षेत्रात बदल होत आहे. त्यात खरीप ज्वारीमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली असून खरीप बाजरीत १९ टक्क्यांनी, मका उत्पादनात ५ टक्क्यांनी, तर रब्बी ज्वारीमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच गव्हाच्या उत्पादनात ३९ टक्क्यांनी घट झाली असून सोयाबीन पिकाच्या उत्पादनात १२ टक्क्यांनी, कापसात ५ टक्क्यांनी आणि उसाच्या उत्पादनात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.कडबाकुट्टीचा वापर केल्यास वैरणीची ३० टक्के बचत होऊ शकते. परंतु, कडबाकुट्टीचा वापर न करता तशीच वैरण जनावरांना टाकली जाते. परिणामी जनावरांच्या शेणमूत्रामुळे वैरण खराब होते. त्यामुळे वैरण पिकांचे उत्पादन वाढवून आणि अधिकाधिक वैरणीची योग्य प्रकारे साठवणूक करून दिवसेंदिवस होत असणारी वैरणीची तूट भरून काढावी लागणार आहे. त्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांनी केले आहे.शेतात उत्पादित होणारा भाजीपाला, फळे आदी विक्रीसाठी शहरात जात असल्यामुळे त्यांचा टाकाऊ भाग वैरण म्हणून उपयोगात न येता शहराच्या कचरा कुंडीत जमा होत आहे. तसेच गावातील सामायिक जमीन, गायरान, देवराई आदीमध्ये अतिक्रमण वाढले आहे. तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आगीमुळे गवताच्या व कडब्यांच्या गंज्यांना आग लागून नुकसान होत आहे. 

टॅग्स :Puneपुणे