शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

ब्रिटिशकालीन पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली; बारामती, इंदापूर, पुरंदरमधील स्थिती, नव्या पुलांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:59 IST

बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांचा विळखापुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज

सोमेश्वरनगर : बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हे पूल पाडून पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. भोर (जि. पुणे) या ठिकाणी नीरा नदीवर इंग्रज सरकारने सन १८८१ मध्ये भाटघर धरणाचे काम पूर्ण केले. तर नीरा नदीच्या दोन्ही बाजूने बारामती व इंदापूर तालुक्यासाठी नीरा डावा कालवा व फलटण व माळशिरस तालुक्यांसाठी नीरा उजवा कालवा, या कालव्याची कामेही त्याच वेळी पूर्ण केली. तसेच दोन गावांतील संपर्क वाढण्यासाठी व दळणवळणासाठी भाटघर धरणांबरोबरच कालाव्यांवरील व नीरा नदीवरील पूल तसेच पालथ्या मोऱ्या व भुयारी मोऱ्यांची निर्मिती केली. कालव्यावरील काही पुलांच्या बांधकामावेळी बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी दगडावर कोरीव १८८१ हे वर्ष टाकले आहे. यावरून कालव्यावरील पूल १८८१ साली बांधल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आज या पुलांना १३५ वर्षे पूर्ण झाली असून ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक पुलांची दगडे निखळून पडली आहेत. पुलांना मध्यभागी बोगदे पडले आहेत. तर भुयारी मोऱ्यांना पाण्याच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात पाटबंधारे खात्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  १८८१मध्ये बांधलेले छोटेखानी भाटघर धरणाचे इंग्रज सरकारने १९१२ साली काम हातात घेतले. ते सलग १५ वर्षे चालले. सन  १९२७ साली नवीन भाटघर धरणाचे काम पूर्ण झाले. त्याआधी ५.३३ टीएमसी असणाऱ्या भाटघर या छोट्या धरणाचे विस्तारीकरण करून ते २३.७२ टीएमसी करण्यात आले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर सन १९६४ साली पुरंदर तालुक्यातील वीर येथे नीरा नदीवर ९.०४ टीएमसी वीर धरणाचे काम पूर्ण करण्यात आले.  मात्र आता ‘आयत्या बिळावर नागोबा’ अशी अवस्था भाटघर व वीर पाटबंधारे खात्याची झाली आहे. ब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांनी विळखा दिला आहे तर गावोगावचे पाणवठे व घाटही उध्व्स्त झाले आहेत. गेल्या १३५ वर्षांपासून कालव्याच्या वितरिकेचे विमोचक बदलले नाहीत. ते जीर्ण झाले असून, पाणी सोडण्याची प्रकिया अवघड बनली आहे.  पंधरा ते वीस वर्षांपासून या कालव्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नीरा डाव्या कालव्याची लांबी १५२ किलोमीटर आहे. या अंतरात जवळपास ६२ वितरिका (फाटे) येतात. यापैकी ८० टक्के वितरिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. या पुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPurandarपुरंदर