शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ब्रिटिशकालीन पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली; बारामती, इंदापूर, पुरंदरमधील स्थिती, नव्या पुलांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:59 IST

बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांचा विळखापुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज

सोमेश्वरनगर : बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हे पूल पाडून पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. भोर (जि. पुणे) या ठिकाणी नीरा नदीवर इंग्रज सरकारने सन १८८१ मध्ये भाटघर धरणाचे काम पूर्ण केले. तर नीरा नदीच्या दोन्ही बाजूने बारामती व इंदापूर तालुक्यासाठी नीरा डावा कालवा व फलटण व माळशिरस तालुक्यांसाठी नीरा उजवा कालवा, या कालव्याची कामेही त्याच वेळी पूर्ण केली. तसेच दोन गावांतील संपर्क वाढण्यासाठी व दळणवळणासाठी भाटघर धरणांबरोबरच कालाव्यांवरील व नीरा नदीवरील पूल तसेच पालथ्या मोऱ्या व भुयारी मोऱ्यांची निर्मिती केली. कालव्यावरील काही पुलांच्या बांधकामावेळी बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी दगडावर कोरीव १८८१ हे वर्ष टाकले आहे. यावरून कालव्यावरील पूल १८८१ साली बांधल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आज या पुलांना १३५ वर्षे पूर्ण झाली असून ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक पुलांची दगडे निखळून पडली आहेत. पुलांना मध्यभागी बोगदे पडले आहेत. तर भुयारी मोऱ्यांना पाण्याच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात पाटबंधारे खात्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  १८८१मध्ये बांधलेले छोटेखानी भाटघर धरणाचे इंग्रज सरकारने १९१२ साली काम हातात घेतले. ते सलग १५ वर्षे चालले. सन  १९२७ साली नवीन भाटघर धरणाचे काम पूर्ण झाले. त्याआधी ५.३३ टीएमसी असणाऱ्या भाटघर या छोट्या धरणाचे विस्तारीकरण करून ते २३.७२ टीएमसी करण्यात आले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर सन १९६४ साली पुरंदर तालुक्यातील वीर येथे नीरा नदीवर ९.०४ टीएमसी वीर धरणाचे काम पूर्ण करण्यात आले.  मात्र आता ‘आयत्या बिळावर नागोबा’ अशी अवस्था भाटघर व वीर पाटबंधारे खात्याची झाली आहे. ब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांनी विळखा दिला आहे तर गावोगावचे पाणवठे व घाटही उध्व्स्त झाले आहेत. गेल्या १३५ वर्षांपासून कालव्याच्या वितरिकेचे विमोचक बदलले नाहीत. ते जीर्ण झाले असून, पाणी सोडण्याची प्रकिया अवघड बनली आहे.  पंधरा ते वीस वर्षांपासून या कालव्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नीरा डाव्या कालव्याची लांबी १५२ किलोमीटर आहे. या अंतरात जवळपास ६२ वितरिका (फाटे) येतात. यापैकी ८० टक्के वितरिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. या पुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPurandarपुरंदर