शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ब्रिटिशकालीन पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली; बारामती, इंदापूर, पुरंदरमधील स्थिती, नव्या पुलांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:59 IST

बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांचा विळखापुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज

सोमेश्वरनगर : बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हे पूल पाडून पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. भोर (जि. पुणे) या ठिकाणी नीरा नदीवर इंग्रज सरकारने सन १८८१ मध्ये भाटघर धरणाचे काम पूर्ण केले. तर नीरा नदीच्या दोन्ही बाजूने बारामती व इंदापूर तालुक्यासाठी नीरा डावा कालवा व फलटण व माळशिरस तालुक्यांसाठी नीरा उजवा कालवा, या कालव्याची कामेही त्याच वेळी पूर्ण केली. तसेच दोन गावांतील संपर्क वाढण्यासाठी व दळणवळणासाठी भाटघर धरणांबरोबरच कालाव्यांवरील व नीरा नदीवरील पूल तसेच पालथ्या मोऱ्या व भुयारी मोऱ्यांची निर्मिती केली. कालव्यावरील काही पुलांच्या बांधकामावेळी बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी दगडावर कोरीव १८८१ हे वर्ष टाकले आहे. यावरून कालव्यावरील पूल १८८१ साली बांधल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आज या पुलांना १३५ वर्षे पूर्ण झाली असून ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक पुलांची दगडे निखळून पडली आहेत. पुलांना मध्यभागी बोगदे पडले आहेत. तर भुयारी मोऱ्यांना पाण्याच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात पाटबंधारे खात्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  १८८१मध्ये बांधलेले छोटेखानी भाटघर धरणाचे इंग्रज सरकारने १९१२ साली काम हातात घेतले. ते सलग १५ वर्षे चालले. सन  १९२७ साली नवीन भाटघर धरणाचे काम पूर्ण झाले. त्याआधी ५.३३ टीएमसी असणाऱ्या भाटघर या छोट्या धरणाचे विस्तारीकरण करून ते २३.७२ टीएमसी करण्यात आले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर सन १९६४ साली पुरंदर तालुक्यातील वीर येथे नीरा नदीवर ९.०४ टीएमसी वीर धरणाचे काम पूर्ण करण्यात आले.  मात्र आता ‘आयत्या बिळावर नागोबा’ अशी अवस्था भाटघर व वीर पाटबंधारे खात्याची झाली आहे. ब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांनी विळखा दिला आहे तर गावोगावचे पाणवठे व घाटही उध्व्स्त झाले आहेत. गेल्या १३५ वर्षांपासून कालव्याच्या वितरिकेचे विमोचक बदलले नाहीत. ते जीर्ण झाले असून, पाणी सोडण्याची प्रकिया अवघड बनली आहे.  पंधरा ते वीस वर्षांपासून या कालव्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नीरा डाव्या कालव्याची लांबी १५२ किलोमीटर आहे. या अंतरात जवळपास ६२ वितरिका (फाटे) येतात. यापैकी ८० टक्के वितरिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. या पुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPurandarपुरंदर