शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

दुर्लक्षामुळे रेबिजने दरवर्षी होतात १८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 11:49 IST

गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते

ठळक मुद्देऔषधोपचार असूनही मृत्यूदर चिंताजनक मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील व्यक्तींचे प्रमाण अधिक जगभरात रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू भारतातपुणे शहरात दरमहा सरासरी साडेसातशे ते आठशे जणांना कुत्रा चावल्याची नोंद

विशाल शिर्के पुणे : कुत्र्याचा चावा दुर्लक्षित करणे... झाडपाल्याचा उपयोग... ग्रामीण भागात केले जाणारे देवादिकांचे उपचार...अशा विविध कारणांमुळे चांगले औषधोपचार असूनही केवळ दुर्लक्षामुळे दरवर्षी सरासरी १८ लोकांचा मृत्यू रेबिजमुळे होत आहे. यातील ९९ टक्के मृत्यू हे ग्रामीण भागातील नागरिकांचे झाले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत ’ला दिली. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लवकर उपचार घेतल्यास रेबिजवर पूर्णपणे नियंत्रण मिळविता येते. मात्र या आजाराला तितकेसे महत्त्व दिले जात नसल्याने कुत्र्याचा चावा जीवघेणा ठरत आहे. पुणे शहरात दरमहा सरासरी साडेसातशे ते आठशे जणांना कुत्रा चावल्याची नोंद महापालिकेकडे होते. मात्र, रेबिजमुळे शहरातील नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अपवादात्मक आहे. रेबिजबाबत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती असल्याने नागरीक पूर्ण उपचार करुन घेतात. त्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरीक मात्र, त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा उपचारच घेत नाहीत. काहीवेळा उपचार अर्धवट सोडून देतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला रेबिजची लागण होते. गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते. तर या चौदा वर्षांत एकूण २५८ नागरिकांना कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष केल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, २०१९मध्येही अजअखेरीस ६ नागरिकांचा रेबिजमुळे मृत्यू झाला आहे. कुत्र्याचा चावा ही आपत्कालीन परिस्थितीसारखी बाब नसली, तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. ---------------------

कुत्र्याच्या पिल्लाचा चावाही जीवघेणा 

अनेकदा लहान कुत्र्याने चावा घेतला असेल तर दुर्लक्ष केले जाते. मात्र, लहान कुत्र्याचे पिल्लू रेबिज बाधित असल्यास ते लक्षात येत नाही. कारण त्याच्या वागण्यात मोठ्या कुत्र्यापेक्षा फारसे बदल दिसून येत नाही. त्यामुळे लहान कुत्र्याचा चावा देखील दुर्लक्षित करु नका, असे आवाहन अरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ----------------------

भारतात रेबिजचे सर्वाधिक बळी 

देशाात दरवर्षी रेबिजमुळे सरासरी २५ ते ३० हजार नागरिकांना प्राण गमवावे लागते. जगभरात रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. --------------------------------

रेबिजमुळे झालेले मृत्यू

२००५            १५२००६            १८२००७            २९२००८            २२२००९            १६२०१०            १५२०११            १८२०१२            २१२०१३            १९    २०१४            २२२०१५            १६२०१६            २०२०१७            १०२०१८            १७२०१९            ०६

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य