शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 14:57 IST

विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे

राहुल शिंदे 

पुणे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी परीक्षा घेतली जात आहे. तसेच ‘वर्क कल्चर’ बदलल्याने आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनी व विद्यार्थी दोघांचा फायदा होत आहे.

पुणे शहर व परिसरात अनेक आयटी कंपन्या असून या कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जाणा-या तरुणांची संख्या चांगलीच वाढली आहे. कारण कोरोनामुळे 2019-21 या कालावधीत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा देणारा प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. सर्वांनाच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. परिणामी कोणत्या विद्यार्थ्याला नोकरी द्यावी,असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारे कोरोनाचा शिक्का पडला असून विविध कंपन्यांकडून आता विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे.

नामांकित ‘आयटी’ कंपन्यांना कर्मचा-यांसाठी प्रशस्त कार्यालय, कँटिन, वाहतुक व्यवस्था, कॉम्प्युटर - इंटरनेट आदी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. परंतु, कोरोनामुळे आयटी कंपन्यांकडून अधिक ‘वर्क फॉर्म होम’ ला पसंती दिली जात आहे. कारण या पायाभूत सुविधांसाठी होणारा कंपनीचा खर्च कमी झाला आहे. तसेच पुण्यात येऊन भाडेतत्वावर घर घेणे, मेस लावणे आदीसाठी कर्मचा-यांना करावा लागणारा खर्च बंद झाला आहे. परिणामी बाहेर गावाहून पुण्यात कामासाठी येणा-या कर्मचा-यांनाही घरी बसून काम करणे सोपे जात आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कमी पगार दिला तरी विद्यार्थी हे काम स्वीकारतात

''सर्वच विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट करण्यासाठी परीक्षा घेतली जात आहे. परिणामी कोरोनाचा फटका सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबर हुशार विद्यार्थ्यांना सुध्दा बसत आहे. तसेच कोरोनामुळे ‘वर्क कल्चर’ बदलल्याने ‘फ्रेशर’विद्यार्थ्यांना घरी बसून सुमारे 150 तासांचे ऑनलाईन काम दिले जात आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कमी पगार दिला तरी विद्यार्थी हे काम स्वीकारत आहे असे डॉ.पराग काळकर (अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी सांगितले.'' 

''कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगारास मोठ्या अडचणी येत आहेत. माझ्या मुलाने मागील वर्षी कंप्युटर सायन्सची पदवी घेतली. परंतु, त्याला व त्याच्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या एकाही विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही.परंतु,कोरोनापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहज नोकरी मिळत असल्याचे दिसून येत आहे असे पालक रोहिणी विटणकर म्हणाल्या आहेत.'' 

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइनexamपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थी