शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 14:57 IST

विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे

राहुल शिंदे 

पुणे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी परीक्षा घेतली जात आहे. तसेच ‘वर्क कल्चर’ बदलल्याने आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनी व विद्यार्थी दोघांचा फायदा होत आहे.

पुणे शहर व परिसरात अनेक आयटी कंपन्या असून या कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जाणा-या तरुणांची संख्या चांगलीच वाढली आहे. कारण कोरोनामुळे 2019-21 या कालावधीत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा देणारा प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. सर्वांनाच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. परिणामी कोणत्या विद्यार्थ्याला नोकरी द्यावी,असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारे कोरोनाचा शिक्का पडला असून विविध कंपन्यांकडून आता विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे.

नामांकित ‘आयटी’ कंपन्यांना कर्मचा-यांसाठी प्रशस्त कार्यालय, कँटिन, वाहतुक व्यवस्था, कॉम्प्युटर - इंटरनेट आदी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. परंतु, कोरोनामुळे आयटी कंपन्यांकडून अधिक ‘वर्क फॉर्म होम’ ला पसंती दिली जात आहे. कारण या पायाभूत सुविधांसाठी होणारा कंपनीचा खर्च कमी झाला आहे. तसेच पुण्यात येऊन भाडेतत्वावर घर घेणे, मेस लावणे आदीसाठी कर्मचा-यांना करावा लागणारा खर्च बंद झाला आहे. परिणामी बाहेर गावाहून पुण्यात कामासाठी येणा-या कर्मचा-यांनाही घरी बसून काम करणे सोपे जात आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कमी पगार दिला तरी विद्यार्थी हे काम स्वीकारतात

''सर्वच विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट करण्यासाठी परीक्षा घेतली जात आहे. परिणामी कोरोनाचा फटका सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबर हुशार विद्यार्थ्यांना सुध्दा बसत आहे. तसेच कोरोनामुळे ‘वर्क कल्चर’ बदलल्याने ‘फ्रेशर’विद्यार्थ्यांना घरी बसून सुमारे 150 तासांचे ऑनलाईन काम दिले जात आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कमी पगार दिला तरी विद्यार्थी हे काम स्वीकारत आहे असे डॉ.पराग काळकर (अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी सांगितले.'' 

''कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगारास मोठ्या अडचणी येत आहेत. माझ्या मुलाने मागील वर्षी कंप्युटर सायन्सची पदवी घेतली. परंतु, त्याला व त्याच्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या एकाही विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही.परंतु,कोरोनापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहज नोकरी मिळत असल्याचे दिसून येत आहे असे पालक रोहिणी विटणकर म्हणाल्या आहेत.'' 

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइनexamपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थी