शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

दररोज एकाचा रेल्वेखाली होतो मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:08 PM

रेल्वेच्या वतीने संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात.

ठळक मुद्देअनेकदा कानात हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडला जातो. गेल्या वर्षात ५४० नागरिक रेल्वेखाली चिरडले गेले असून १४५ जण जखमी धोकादायक पद्धतीने मार्ग ओलांडणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई

पुणे : गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात दररोज एकाहून अधिक व्यक्तींनी रेल्वेखाली आपले प्राण गमावले आहेत. गेल्या वर्षात ५४० नागरिक रेल्वेखाली चिरडले गेले असून, १४५ जण जखमी झाले आहेत. पुणे-लोणावळा मार्गावरील पिंपरी, कासारवाडी, चिंचवड, दापोडी, खडकी आणि आकुर्डी स्टेशन अपघातांच्या दृष्टीने संवेदनशील मानली जातात. रेल्वेच्या वतीने अशा संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात. अशा पद्धतीने मार्ग ओलांडणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. गेल्या आर्थिक वर्षांत ६ हजार ९९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेचे पुणे मंडल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. रेल्वे मार्ग ओलांडण्यातील धोके दाखविण्यासाठी रेल्वेच्या वतीने पथनाट्य सादर केली जातात. या शिवाय बॅनर, पोस्टर आणि फलकद्वारे देखील प्रवाशांचे लक्ष वेधले जाते. मात्र, त्यानंतरही थोडासा वेळ वाचविण्यासाठी जीवाचा धोका पत्करण्यात येतो. अनेकदा कानात हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडला जातो. त्यामुळे जोखीम आणखी वाढते. एखादा अपघात झाल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडते, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.   

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू