शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

दुष्काळी १२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:39 IST

निर्णायक वेळी बारा गावांतील प्रतिनिधींना घेऊन मुंबई येथे बैठक आयोजित करू, असा विश्वास शिरूरच्या बारा गावांच्या आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला....

शिक्रापूर (पुणे) : दुष्काळी १२ गावांना पाणी मिळावे, यासाठी गेले काही दिवस प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सर्वात मोठे काम सिंचन विभागात करावे लागणार आहे. या गावांना पाणी मिळावे. यासाठी सरकार सकारात्मक आहे. निर्णायक वेळी बारा गावांतील प्रतिनिधींना घेऊन मुंबई येथे बैठक आयोजित करू, असा विश्वास शिरूरच्या बारा गावांच्या आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

दुष्काळग्रस्त भागातील बारा गावांतील आंदोलकांना सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भीमाशंकर कारखाना पारगाव (ता. आंबेगाव) येथे निमंत्रित केले होते. यावेळी वळसे पाटील बोलत होते. डिंभा धरण कळमोडी धरण तसेच कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या बाबतची सद्य:परिस्थिती सांगत वळसे-पाटील यांनी शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळग्रस्त बारा गावांच्या लोकप्रतिनिधींना खात्री बाळगा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केली असून, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी वळसे-पाटील यांनी दिली.

डिंभा धरणातून बोगदा करून पाणी माणिकडोहमार्गे करमाळ्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पाण्यासाठी सुद्धा आपली लढाई सुरू आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात नदीवर ६५ बंधारेदेखील पावसाळ्यानंतर धरणाच्या पाण्यावर भरले जातात. यामध्ये बदल होऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करीत आहोत. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार खेड तालुक्यातील व शिरूर तालुक्यातील गावांसाठी कळमोडीचे पाणी मिळावे. यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी संमती दर्शविली आहे.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, प्रमोद पऱ्हाड, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, दादासाहेब खर्डे, अमोल थिटे, सनी थिटे, संदीप खैरे, भरत साकोरे, संदीप खैरे, सूर्यकांत थिटे, योगेश कदम, किशोर रत्नपारखी, संजय चौधरी, अरुण चौधरी, अर्जुन भगत, सनी थिटे, भगवान घोडेकर, भाऊसाहेब थिटे, नामदेव पानसरे, पांडुरंग लोखंडे व १२ गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये :

पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होऊन या प्रश्नांमध्ये मोठे यश येईल अशी अपेक्षा आहे. पाणीप्रश्न सोडविताना कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये. त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून चर्चा करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड