शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

दुष्काळी १२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:39 IST

निर्णायक वेळी बारा गावांतील प्रतिनिधींना घेऊन मुंबई येथे बैठक आयोजित करू, असा विश्वास शिरूरच्या बारा गावांच्या आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला....

शिक्रापूर (पुणे) : दुष्काळी १२ गावांना पाणी मिळावे, यासाठी गेले काही दिवस प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सर्वात मोठे काम सिंचन विभागात करावे लागणार आहे. या गावांना पाणी मिळावे. यासाठी सरकार सकारात्मक आहे. निर्णायक वेळी बारा गावांतील प्रतिनिधींना घेऊन मुंबई येथे बैठक आयोजित करू, असा विश्वास शिरूरच्या बारा गावांच्या आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

दुष्काळग्रस्त भागातील बारा गावांतील आंदोलकांना सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भीमाशंकर कारखाना पारगाव (ता. आंबेगाव) येथे निमंत्रित केले होते. यावेळी वळसे पाटील बोलत होते. डिंभा धरण कळमोडी धरण तसेच कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या बाबतची सद्य:परिस्थिती सांगत वळसे-पाटील यांनी शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळग्रस्त बारा गावांच्या लोकप्रतिनिधींना खात्री बाळगा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केली असून, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी वळसे-पाटील यांनी दिली.

डिंभा धरणातून बोगदा करून पाणी माणिकडोहमार्गे करमाळ्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पाण्यासाठी सुद्धा आपली लढाई सुरू आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात नदीवर ६५ बंधारेदेखील पावसाळ्यानंतर धरणाच्या पाण्यावर भरले जातात. यामध्ये बदल होऊ नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करीत आहोत. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार खेड तालुक्यातील व शिरूर तालुक्यातील गावांसाठी कळमोडीचे पाणी मिळावे. यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी संमती दर्शविली आहे.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, प्रमोद पऱ्हाड, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, दादासाहेब खर्डे, अमोल थिटे, सनी थिटे, संदीप खैरे, भरत साकोरे, संदीप खैरे, सूर्यकांत थिटे, योगेश कदम, किशोर रत्नपारखी, संजय चौधरी, अरुण चौधरी, अर्जुन भगत, सनी थिटे, भगवान घोडेकर, भाऊसाहेब थिटे, नामदेव पानसरे, पांडुरंग लोखंडे व १२ गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये :

पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होऊन या प्रश्नांमध्ये मोठे यश येईल अशी अपेक्षा आहे. पाणीप्रश्न सोडविताना कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये. त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून चर्चा करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड