शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा: भाजप नेत्याचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:48 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद असून रोजगार व नोकरी गेल्यामुळे हजारो कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पुणे:  राज्य शासनाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थी, पालक, शिक्षणसंस्था यापैकी कोणत्याही घटकाला दिलासा देण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद असून रोजगार व नोकरी गेल्यामुळे हजारो कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.तसेच सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु असून शाळांच्या विविध सुविधांचा वापर होत नसतानाही विद्यार्थ्यांकडे संपूर्ण शुल्क वसूलीचा तगादा लावला जात आहे. तसेच शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबविले जात आहे, असे नमूद करून भंडारी म्हणाले, राज्य शासनाकडे याबाबत अनेक तक्रारी दाखल असून त्यावर काहीच कारवाई होत नाही. एकही विद्यार्थी शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी शासनाने घेतलीच पाहिजे.

भंडारी म्हणाले , शासन व शिक्षण संस्था यांचे हितसंबंध असल्यानेच शैक्षणिक शुल्कनिश्चिचतीचा प्रस्ताव शासनाने खुंटीवर टांगून ठेवला आहे,असा आरोप करत भंडारी म्हणाले, सध्याचे सरकार हे शिक्षण सम्राटांचे आहे. शिक्षणसंस्थांच्या मनमानीमुळे पालकांची पिळवणूक होत आहे. शुल्क नियामक समित्यांकडूनही पालकांना कोणताही न्याय मिळत नाही. त्यामुळे पालकांचा समित्यांकडून केल्या जाणाऱ्या कार्यपध्दतीवरील विश्वास उडाला आहे.

शासनाने शुल्क निश्चितीच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांवर वाढीव शुल्काचा बोजा टाकू नये, कोणत्याही कारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; याबाबत शासनाने काळजी घेत अडचणीत असलेल्या संस्थांना मदत करावी. शासनाने शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकांशी संवाद साधण्याची प्रक्रिया राबविली पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील घतकांचे शोषण थांबविले पाहिजे. शासनाने याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा विविध संघटनांच्या आंदोलनात सहभागी होत भाजपही रस्त्यावर उतरेल, असा इशाराही भंडारी यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणStudentविद्यार्थी