शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती वितरणाची ‘ईडी’कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 07:00 IST

सुमारे २ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय ..

पुणे: समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिष्यवृत्ती वितरणामध्ये सुमारे २ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी प्रवर्तन निर्देशनालय (ईडी) कार्यालयाने राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांकडे पत्रव्यवहार केला आहे.त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणाची माहिती तपासली जाणार आहे.वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळाच्या विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे शिष्यवृत्ती दिल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे काही संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणात गैरव्यवहार झाल्या प्रकरणी विशेष चौकशी पथकाने तपासणी केली होती.त्यात काही आक्षेपार्ह  बाबी अढळून आल्या. त्यात समाज कल्याण विभागाने ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना वितरित झालेल्या तब्बल १७०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीत गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यात एससी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ईडी कार्यालयाकडे देण्यात आली. त्यावर ईडीने समाज कल्याण विभागाच्या राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठवून शिष्यवृत्तीची माहिती मागवली.प्रामुख्याने वर्धा येथे झालेला गैरव्यवहार महाराष्ट्रात इतर ठिकाणी झाला आहे का? याबाबत ईडीकडून तपासणी केली जात असल्याचे समाज कल्याण विभागातील अधिका-यांकडून सांगितले.ईडी कार्यालयाने केलेल्या पत्रव्यवहारानुसार समाज कल्याण विभागाने सर्व शिक्षण संस्थांकडून २०१० ते २०१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती माहिती मागविली आहे. पुणे विभागीय प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयाने येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण संस्थांकडून माहिती मागविली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ६०० महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाने पत्र पाठवले आहे.दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही तर भविष्यात होणा-या परिणामास प्राचार्यांना जबाबदार ठरविण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी,असे या पत्रात नमूद केले आहे.------------------------- नऊ महाविद्यालयांनी शासनाकडे जमा केली रक्कम विशेष चौकशी पथकाने दिलेल्या अहवालानुसार काही महाविद्यालयांकडे वसूली निघाली होती.त्यामुळे संबंधित महाविद्यालयांना शासनाकडे रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शासनाच्या चौकशीला सामोरे जाण्याऐवजी तुटपुंजी रक्कम जमा केलेली बरी या विचाराने पुणे जिल्ह्यातील नऊ महाविद्यालयांनी शासनाकडे वसूलीची रक्कम जमा केली. चौकशी पथकाने केलेल्या तपासणीत या नऊ महाविद्यालयांकडे  वसूलीची ११ हजार २३ हजार ,४३ हजार आणि १ लाख रुपये अशी रक्कम निघाली आहे.-----------------राज्यातील प्रादेशिक समाज कल्याण विभागाकडून मागवली माहितीपुण्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयांना ईडी कार्यालयाने शिष्यवृत्तीबाबत पत्रव्यवहार केला आहे. पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण संस्थांकडून  ईडीच्या पत्रानुसार शिष्यवृत्तीविषयक माहिती मागवली आहे. महाविद्यालयांनी ही माहिती पाठविण्यास सुरूवात केली असून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणारी माहिती ईडीला सादर केली जाईल.- अविनाश देवसटवार,उपायुक्त, समाज कल्याण प्रादेशिक कार्यालय,पुणे

टॅग्स :PuneपुणेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयStudentविद्यार्थी