शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 13:12 IST

विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण

बारामती/काटेवाडी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले आहे. मात्र, पालखी सोहळा तोंडावर आलेला असताना संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे अपूर्ण काम वारकरी भाविकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळ्याची वाट बिकट ठरणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गापैकी पाटस ते बारामती मार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. मात्र, लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काम संथ गतीने सुरु आहे. मासाळवाडी येथील पुलाच्या अंडरपासचे काम अद्याप सुरूच आहे. या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी एकेरी वाहतूक देखील सुरु आहे. मात्र, अंडरपासचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. येथील अंडरपासच्या भोवती राडारोडा जैसे थे आहे. येथील कामाच्या सळया उघड्यावर आहेत. पालखी प्रस्थान काळात या कामाच्या भोवती संरक्षक कठडा उभारण्याची गरज आहे. याच्या भोवती असणारे खड्डे अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगत असणाऱ्या गटारी भोवती काही ठिकाणी खड्डे आहेत. हे खड्डे बुजविण्याची गरज आहे. नव्याने खोदाई केलेला रस्ता पालखी सोहळा आगमनापूर्वी पूर्णतत्वास जाणे महत्त्वाचे आहे. रस्त्यासाठी नव्याने जुळवणी करताना लगतचा रस्ता पूर्ण खड्ड्यात आहे. त्यामुळे लिमटेक येथून मार्गस्थ होताना पालखी सोहळ्यातील शेकडाेंच्या संख्येने वाहने आणि लाखो वारकरी भाविकांसाठी हा मार्ग अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखी आगमनाच्या काळात कर्मचारी नियुक्त करुन संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.

काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील पालखी रथाच्या भोवती मेंढ्याचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण एसटी स्टॅन्ड परिसरात पार पडते. मात्र, या परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. या कामामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. गटार योजनेच्या विलंबाने हे काम थांबले होते. ते काम सध्या सुरु आहे. मात्र, ते युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. उड्डाण पुलावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पुलावरील दुसऱ्या मार्गाचे काम सुरु आहे. मात्र, ते देखील वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

काम पूर्ण होण्यासाठी कधीचा मुहूर्त उजाडणार ?

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग एकूण १३७ किमीचा आहे. त्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे. पालखी मार्गात ग्रामीण भागात पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोंडले बोडसे या तीन टप्प्यांचा समावेश आहे. त्यापैकी पाटस ते बारामती काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरु आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी कधीचा मुहूर्त उजाडणार, याबाबत संबंधित गावांमध्ये चर्चा रंगली आहे.

उन्हाच्या तडाख्यात चालावे लागणार

बारामती इंदापूर मार्गावर यापूर्वी महाकाय वडाची झाडे असल्याने हा मार्ग हिरवागार होता. पालखी सोहळ्यातील भाविकांना या मार्गावर विसावा घेण्यासाठी झाडांची हिरवाई होती. वारकरी भाविक वडाच्या झाडाच्या पारंब्यांना झोका घेण्याचे खेळ खेळण्यात रंगून जात. मात्र, पालखी महामार्गाच्या कामासाठी सर्व झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पालखीतील भाविकांना झाडांशिवाय उन्हाच्या तडाख्यात चालावे लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाhighwayमहामार्गRainपाऊस