शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 13:12 IST

विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण

बारामती/काटेवाडी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले आहे. मात्र, पालखी सोहळा तोंडावर आलेला असताना संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे अपूर्ण काम वारकरी भाविकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळ्याची वाट बिकट ठरणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गापैकी पाटस ते बारामती मार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. मात्र, लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काम संथ गतीने सुरु आहे. मासाळवाडी येथील पुलाच्या अंडरपासचे काम अद्याप सुरूच आहे. या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी एकेरी वाहतूक देखील सुरु आहे. मात्र, अंडरपासचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. येथील अंडरपासच्या भोवती राडारोडा जैसे थे आहे. येथील कामाच्या सळया उघड्यावर आहेत. पालखी प्रस्थान काळात या कामाच्या भोवती संरक्षक कठडा उभारण्याची गरज आहे. याच्या भोवती असणारे खड्डे अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगत असणाऱ्या गटारी भोवती काही ठिकाणी खड्डे आहेत. हे खड्डे बुजविण्याची गरज आहे. नव्याने खोदाई केलेला रस्ता पालखी सोहळा आगमनापूर्वी पूर्णतत्वास जाणे महत्त्वाचे आहे. रस्त्यासाठी नव्याने जुळवणी करताना लगतचा रस्ता पूर्ण खड्ड्यात आहे. त्यामुळे लिमटेक येथून मार्गस्थ होताना पालखी सोहळ्यातील शेकडाेंच्या संख्येने वाहने आणि लाखो वारकरी भाविकांसाठी हा मार्ग अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखी आगमनाच्या काळात कर्मचारी नियुक्त करुन संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.

काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील पालखी रथाच्या भोवती मेंढ्याचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण एसटी स्टॅन्ड परिसरात पार पडते. मात्र, या परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. या कामामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. गटार योजनेच्या विलंबाने हे काम थांबले होते. ते काम सध्या सुरु आहे. मात्र, ते युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. उड्डाण पुलावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पुलावरील दुसऱ्या मार्गाचे काम सुरु आहे. मात्र, ते देखील वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

काम पूर्ण होण्यासाठी कधीचा मुहूर्त उजाडणार ?

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग एकूण १३७ किमीचा आहे. त्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे. पालखी मार्गात ग्रामीण भागात पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोंडले बोडसे या तीन टप्प्यांचा समावेश आहे. त्यापैकी पाटस ते बारामती काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरु आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी कधीचा मुहूर्त उजाडणार, याबाबत संबंधित गावांमध्ये चर्चा रंगली आहे.

उन्हाच्या तडाख्यात चालावे लागणार

बारामती इंदापूर मार्गावर यापूर्वी महाकाय वडाची झाडे असल्याने हा मार्ग हिरवागार होता. पालखी सोहळ्यातील भाविकांना या मार्गावर विसावा घेण्यासाठी झाडांची हिरवाई होती. वारकरी भाविक वडाच्या झाडाच्या पारंब्यांना झोका घेण्याचे खेळ खेळण्यात रंगून जात. मात्र, पालखी महामार्गाच्या कामासाठी सर्व झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पालखीतील भाविकांना झाडांशिवाय उन्हाच्या तडाख्यात चालावे लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाhighwayमहामार्गRainपाऊस