शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राडारोड्यामुळे रस्त्यावर साचली तळी

By admin | Updated: July 8, 2016 04:18 IST

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या रस्त्यांवरील पन्हाळींकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे बहुसंख्य रस्त्यांना आता ती व्यवस्थाच राहिलेली नाही. काँक्रीटच्या काही रस्त्यांवर ती व्यवस्था नव्याने केली असली

पुणे : पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या रस्त्यांवरील पन्हाळींकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे बहुसंख्य रस्त्यांना आता ती व्यवस्थाच राहिलेली नाही. काँक्रीटच्या काही रस्त्यांवर ती व्यवस्था नव्याने केली असली, तरी पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळेच थोड्याशा पावसाने रस्ते पाण्याखाली जाण्याचा अनुभव पुणेकरांना नुकत्याच झालेल्या पावसात आला.अशी होती जुनी व्यवस्थायापूर्वीच्या रस्त्यांना पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रशस्त पन्हाळी असत. त्यांना चौकांमधील ड्रेनेज जोडलेले असे. तसेच रस्त्याला मध्यभागापासून दोन्ही बाजूंना व्यवस्थित उतार दिलेला असे. त्यामुळे कितीही मोठा पाऊस झाला, तरी पाणी रस्त्यात साचून राहात नसे. त्या पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हायचा. फारच मोठा पाऊस झाला तर थोड्या वेळाने का होईना पण सर्व पाणी पावसाळी गटारीतून निघून जात असे.रस्त्यांच्या कामात मोडल्या पन्हाळीरस्ते नवे करण्याच्या नगरसेवकांच्या हौसेतून ही व्यवस्थाच अनेक ठिकाणी मोडीत निघाली असल्याचे मागील आठवड्यातील दोन दिवसांच्या पावसात दिसून आले आहे. डांबरी रस्त्यांच्या पूर्वीच्या पन्हाळी यात बुजवल्या गेल्या आहेत. रस्त्यांच्या मध्यभागातून दोन्ही बाजूंना दिला जात असलेला उतार देण्याकडेही ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच दोन दिवसांच्या पावसात शहराच्या मध्यभागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी पाण्याची तळी साचल्यामुळे त्यातून वाट काढणे अवघड झाले होते. विशेषत: शहरांच्या पेठांमधील रस्त्यांमध्ये असे प्रकार मोठ्या संख्यने झाले. पाणी साचल्याने अपघातरस्ते नवे करताना ते खोदून करणे अपेक्षित असते. मात्र त्याला वेळ लागतो. त्यामुळे ठेकेदार आहे त्या रस्त्यावरच खडी, डांबर ओतून रस्ता तयार करतो. त्यातून बहुतेक रस्ते बरेच वरच्या बाजूला आले आहेत. काही ठिकाणी तर रस्ते आता थेट बाजूच्या दुकानांच्या शटरला लागू लागले आहेत. पन्हाळी बुजण्याचे हेही एक कारण आहे. पन्हाळी नसल्यामुळे पावसाचे पाणी जागा मिळेल त्या दिशेने वाहत जाते. पावसाचा जोर जास्त असला तर पाणी थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत येते. या साचून राहिलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही ठिकाणी वाहनांचे किरकोळ अपघातही झाले.मोबाईल कंपन्याही जबाबदारमोबाईल कंपन्यांच्या रस्ते खोदाईतूनही बहुतेक मोठ्या रस्त्यांच्या पन्हाळींची वाट लागली आहे. कंपन्या हे काम ठेकेदारांकडून करून घेतात. ठेकेदारांच्या कामावर ना पालिकेचे नियंत्रण असते ना या कंपन्यांचे. त्यामुळे पन्हाळीच्या बरोबर कडेने कंपन्यांकडून रस्ते खोदले गेले. ते बुजवताना पन्हाळींचा विचार न करता बुजवले गेले. डांबरी रस्त्यांची खोदाई सिमेंटने, तर सिमेंटच्या रस्त्यांची खोदाई डांबराने बुजवण्याचे प्रकारही लॉ कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, गरवारे कॉलेज रस्ता व अन्य बऱ्याच ठिकाणी झाले आहेत. या पद्धतीने पन्हाळी बुजवल्या गेल्याने पाणी वाहून नेण्यासाठी त्या निकामी झाल्या आहेत. काँक्रीटचे रस्तेही कारणीभूतसिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची रुंदी जास्त असेल तर तिथे गटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काँक्रीटच्या रस्त्यामुळे पावसाचे पाणी मुरत नाही. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे या रस्त्यांवरचे प्रमाण मोठे आहे. त्या तुलनेत गटारीमधील वाहिन्यांचे व्यास मात्र कमी आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठा असला, की या वाहिन्या निरुपयोगी होतात. त्यातूनही त्यावर प्लॅस्टिकचा कचरा, किंवा झाडांची पाने असे काही आले, की त्यातून पाणी जाणेच बंद होते. हे पाणी मग साचून राहते व रस्त्यावर येते. त्यामुळे या मोठ्या रस्त्यांवरची पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणाही कुचकामीच ठरली आहे.नालेसफाईचा गाळ रस्त्यावरचपावसाळ्यापूर्वी पालिकेकडून पावसाळी गटारींची स्वच्छता केली जाते. ही स्वच्छता करताना गटारीतून निघालेला गाळ तिथेच कडेला लावून ठेवला जातो. ही स्वच्छतेची कामे पालिका ठेकेदाराकडून करून घेते. निघालेल्या गाळाची विल्हेवाट त्यानेच लावणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ते गाळ काढतात व निघून जातात. गाळ उचलण्याचे काम आमचे नाही, पालिकेचे आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येते. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ती जबाबदारी ठेकेदाराची आहे असे सांगितले जाते. या टोलवाटोलवीत गाळ तसाच पडून राहतो व पाऊस झाला की वाहून पुन्हा नालीत अथवा गटारीत जातो. कर्नाटक हायस्कूल, दशभूजा गणपती, वडगाव शेरी अशा अनेक ठिकाणी असा गाळ गटारी किंवा नालीच्या कडेला पडून राहिलेला आहे. नागरिकांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.क्षेत्रीय कार्यालयांचीजबाबदारी ठेकेदारांकडून रस्त्यांची कामे करताना पन्हाळींची मोडतोड होते हे खरे असले तरी आता पावसाळी गटारांसाठी थेट पाईपच टाकले जातात. मोठ्या रस्त्यांवर, ते काँक्रीटचे किंवा डांबरी असले तरीही आता पाईपलाईनच असते. त्यातून पावसाचे पाणी वाहून जाते. लहान रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचून राहात असल्याच्या तक्रारी आहेत. क्षेत्रीय कार्यालयांनी तिथे काम करणे अपेक्षित आहे.- राजेंद्र राऊत, पथ विभाग प्रमुखगावांमधून येतो कचरापालिकेच्या हद्दीत नसलेल्या गावांमधून बराच कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो. तो वाहत येतो व शहरातील नाल्यांमध्ये अडकतो. त्यामुळे पाणी अडून राहते. पावसाळी गटारींमध्येही फार मोठ्या प्रमाणात कचरा असतो. त्यामुळे पाणी प्रवाही राहात नाही. क्षेत्रीय कार्यालयांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- सुरेश जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख