शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्ता धोक्यात: सिध्दू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:56 PM

देशामध्ये सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देप्रियंका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने पक्षात सकारात्मक वातावरण

पुणे:  केंद्रातील भाजप सरकार विरोधात कोणत्याही व्यक्तिने आवाज उठवल्यास भाजपच्या मंत्र्याकडून संवाद साधला जात नाही. हे अहंकाराचे लक्षण आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये कमालीचा अहंकार भरलेला आहे. मात्र, जिथे अहंकार येतो तिथे विनाश निश्चित असतो. देशामध्ये सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांमुळे निवडणुक आयोग, सीबीआय यांसारख्या संस्थांची स्वायत्ता देखील धोक्यात आले आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेसचे नवज़्योत सिंग सिध्दू यांनी भाजपासरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यांवर हल्लाबोल चढविला.  नवज्योत सिंग सिध्दू यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिध्दू म्हणाले, देशात शेती मालाला कवडीमोल भाव मिळतोय, तसेच बेरोजगारी, गुन्हेगारी वाढली आहे. मात्र याविषयी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाही. ज्या उद्देशासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. तो फसल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. प्रियंका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगतानाच त्यांना सोपविलेली जबाबदारी सोपी नक्कीच नाही.  प्रियंका यांच्या खांद्यावर देशातील सर्वात अवघड भाग समजला जाणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे. परंतु, प्रियंका गांधी यांचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. त्याचबरोबर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत एका दिवसात ७५० कोटी कुठून आले असा सवाल उपस्थित करतानाच ते नोटाबंदीच्या काळात कोणत्याही रांगेत उभे दिसले नाही असा टोलाही त्यांनी शहा यांना लगावला.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारPriyanka Gandhiप्रियंका गांधी