शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सोलापूरला पाणी सोडल्याने ‘उजनी’त घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:53 IST

उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते

भिगवण : उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊन पाणीसाठा मृत साठ्यात गेला आहे. परिणामी शेतकरीवर्गासह नदीकाठावरच्या गावांवरील पाणी संकट गडद झाले आहे. मंगळवारी (दि. २) सकाळी धरणाची पाणीपतळी वजा २२.४२ टक्के एवढी झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली.

उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते. यंदा प्रथमच उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये गेला आहे. कारण दर वर्षी उजनी धरण १ मेच्या आसपास उणे होते. मागील वर्षी २३ मेपर्यंत उजनी अधिकमध्ये होते. मात्र, या वर्षी दोन ते अडीच महिने अगोदरचउपयुक्त पाणी संपले आहे. यामुळेऐन दुष्काळात तेरावा महिना उजाडण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.नदीद्वारे पाणी न सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी....सोलापूर शहराला पाणी पाईपलाईनद्वारे नेणे गरजेचे आहे. मात्र, उजनीतून ते पाणी नदीद्वारे सोडले जात असल्याने या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातून उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात मोठी घट होते. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली राजकारण्यांच्या शेतीसाठी या पाण्याचा वापर होत आहे. नदीद्वारे पाणी सोडू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी वेळोवेळी केली आहे.सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता खाली पाणी सोडल्याने उजनी जलाशयावरील जवळजवळ सर्वच पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसणार आहे. सोलापूरला पिण्यासाठी पाणी पाहिजे; परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना त्यामुळे बंद पडणार आहेत त्याचे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.उजनीच्या पाण्याचा विचार करता, प्रथम मूळ धरणग्रस्त, उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांचा विचार केला जात नाही. धरण निर्मितीपासून पाणी नियोजनासाठी उजनी धरण प्राधिकरण मंडळाची निर्मितीची मागणी धूळ खातच पडली आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने मतांच्या जोगव्यासाठी भाजप सरकारने पिण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने निवडणुकीच्या प्रचारात उजनीचा पाणीप्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. सोडलेल्या पाण्यावर मते मिळणार असली तरी दुष्काळाची दाहकता नक्कीच वाढेल.

टॅग्स :DamधरणPuneपुणे