शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

थंडी वाढल्याने पिंपरीत वाढले अपघात

By admin | Updated: December 22, 2014 05:23 IST

शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी

पिंपरी : शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी प्रवासाला जाताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दहा दिवसांत पहाटे आणि सकाळच्या वेळेतच अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी तर एकाच दिवसात अपघाताच्या चार घटना घडल्या. पैकी तीन अपघात सकाळी साडेसहा ते आठच्या सुमारास घडले. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक हैराण आहेत. अपघाताची कारणे वेगवेगळी असली, तरी बहुतेक अपघात वाढत्या थंडीमुळेही घडत आहेत. अनेकजण कामानिमित्त सकाळी लवकरच घराबाहेर पडतात. व्यावसायिकांसह नोकरदार सकाळीच घरातून निघतात. मात्र, वाहनाने जाताना हवी तितकी काळजी घेतली जात नाही. यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत. वाढत्या थंडीमुळे वातावरणात दाट धुके निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनाच्या समोरच्या काचेवर दव जमा होतात. प्रवासादरम्यान समोरचे स्पष्ट दिसत नाही. रस्ताही लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठी वाहनाचा वेग कमी असावा, वायपर सुस्थितीत असावेत, तसेच लाईट सुरू ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून समोरील वाहनास अंदाज येऊ शकतो. वेग कमी असताना वाहनाचे चाक खड्ड्यात गेल्यास अथवा रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाल्यास जीवितास धोका निर्माण होत नाही. थंडीत दुचाकीवर प्रवासाला जाताना हेल्मेटसह स्वेटर, हातमोजे, बूट घालणे आवश्यक आहे. हेल्मेटविना दुचाकी चालविल्यास थंड हवा नाका-तोंडात गेल्याने डोके दुखून दुचाकीवरील नियंत्रण सुटू शकते. हातमोजे वापरणेही गरजेचे आहे. ही साधी गोष्ट अपघातास निमंत्रण देणारी ठरू शकते. दुचाकीचे नियंत्रण बहुतांश हँडलवरच असते. त्यासाठी बोटांचा उपयोग होतो. क्लच, बे्रक दाबणे या प्रक्रियांवर परिणाम होऊन दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडू शकतो. (प्रतिनिधी)