शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पावसाअभावी ५ जिल्हे दुष्काळाच्या छायेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 6:10 AM

निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़

पुणे : निम्मा हंगाम संपल्यानंतरही १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत़ औरंगाबाद, जालना, नंदूरबार, बुलडाणा व सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याने परिस्थिती कठीण आहे़कोकणात सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस झाला़ ठाणे व पालघर येथे सरासरीपेक्षा ३६ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ५ टक्के पाऊस जास्त झाला, पण धुळे, जळगाव, नंदूरबार, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत प्रमाण कमी आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे़ विदर्भात ४ टक्के पाऊस जास्त झाला असला, तरी अमरावती, बुलडाणा, वर्धा या ३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे़जुलैमध्ये राज्यात अनेक भागांत पावसामध्ये खंड पडल्याने पिकाला ताण आला आहे़ या पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस पडला नाही, तर अनेक ठिकाणी उगवलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे़>या जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग१ जून ते ३ आॅगस्ट या काळातील पाऊस पाहता, नंदूरबार, जालना, बुलडाणा, औरंगाबाद, सांगली जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यल्प असून, आतापर्यंतचे प्रमाण लक्षात घेता, तेथे दुष्काळसदृश्य स्थिती दिसत आहे. औरंगाबाद येथे सरासरीपेक्षा ३४ टक्के, जालना येथे ३३ टक्के, नंदूरबार येथे ३० टक्के, बुलडाणा येथे २७ टक्के आणि सांगली येथे २७ टक्के इतका पाऊस कमी झाला आहे़पाऊस लांबल्यास परिस्थिती चिंताजनकजिल्ह्यांच्या काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले, तर काही तालुक्यांमध्ये ते कमी असते़ पुढील दोन आठवड्यांत पावसाचे प्रमाण कमी असेल़ सध्याचा खंड वाढल्यास जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्या दृष्टीने पिकांच्या पाण्याचे नियोजन आता करण्याची आवश्यकता आहे़ दोन आठवडे कोरडे गेल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते़- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :droughtदुष्काळ