शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

सध्याच्या सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 5:36 AM

सुशीलकुमार शिंदे : साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे अभिजन-बहुजन हा भेद काहीसा दूर झाला आहे. सध्या मोठी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे होत आहेत. समाजात भयावह घटना घडत आहेत, धार्मिक उन्माद वाढला आहे. कठीण काळातच कवीचे काम आव्हानात्मक असते, अशा शब्दांत कवी सुशीलकुमार शिंदे यांनी कवीचे भावविश्व ‘लोकमत’कडे उलगडले.

साहित्य अकादमीने कवितासंग्रहाची दखल घेतली याचा खूपच आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासारख्या काहीतरी लिहू पाहणाऱ्याला मिळालेली कौतुकाची थाप आणि पोचपावतीच आहे. मी ज्या लेखकांचे साहित्य वाचत मोठा झालो, त्यांनाच मी हा पुरस्कार समर्पित करतो, असे शिंदे यांनी सांगितले. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला मुंबईची पार्श्वभूमी आहे. मी मुंबईचे पाहिलेले जग, वेगवेगळे परिघ अशा पद्धतीने कवितासंग्रहामध्ये परिवेश मांडला आहे. ‘कोणत्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीरच असतो’, अशा ओळींमधून भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकरांची कविता मला खूप प्रभावी वाटते. लहानपणापासून मी भालचंद्र नेमाडे सरांचे साहित्य वाचतो आहे. माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर एके दिवशी नेमाडे सरांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, २०१७ मध्ये सर्वात आवडलेली कविता म्हणजे ‘दहा बाय दहाची खोली’. अशा प्रतिक्रिया एका कवीला खूप समाधान देणाºया, प्रोत्साहन देणाºया असल्याचे त्यांनी सांगितले....तेव्हा कवी व्यथित होतोकवी समाजाचाच एक घटक असतो. दाभोलकरांची हत्या होते, तेव्हा माणूस, कवी म्हणून मी प्रचंड व्यथित होतो आणि त्यातून कविता सुचू लागते. ‘उजेड पेरणाºया मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत’ अशी एक ओळ कवितेमध्ये आहे. शहरी आणि ग्रामीण, अभिजन आणि बहुजन असा फरक आता राहिलेला नाही, असे मला वाटते. सामाजिक माध्यमांतून साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे