शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाने गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 03:03 IST

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा ...

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे कृषी संपन्न असलेल्या इंदापूर तालुक्यातील जवळपास ३० गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उजनीतील पाण्याची पातळी दिवसोंदिवस खालावत असल्याने बागायती क्षेत्रातील एक लाख एकर शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. याचा परिणाम उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील व्यवसायांच्या अर्थकारणावर होणार आहे. येत्या दोन दिवसांत उजनी उणेमध्ये जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, व सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बागायती क्षेत्र याच उजनीमुळे समृद्ध झाला आहे. मात्र, यंदाच्या पावसाने ढील दिल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे धरणा काठावरील नागरिक, शेतकरी आणि विविध व्यावसायिक काळजीत पडले आहेत.इंदापूर तालुक्यातील एकूण बागायती शेतीचे क्षेत्र हे सुमारे ८० हजार ते १ लाख एकर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस, डाळींब, केळी, द्राक्ष, चिक्कू, आंबा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असून, ही गावे आर्थिक बाबतीत सक्षम बनली आहेत. मात्र, धरणाने तळ गाठल्याने हे व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.यापूर्वी २०१६ च्या दरम्यान उजनीच्या पाण्यात कमालीची घट झाली होती. त्यावेळी देखील पाण्याअभावी येथील शेती आणि व्यवसाय धोक्यात आले होते. त्यानंतर यावर्षी पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बºयाच गावांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास ३० गावांतील नळपाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचा पुरवठा दिसून येत नाही. उजनीची पाणीपातळी खालावल्याने अनेक गावांना उजनीमधून पाणीपुरवठा करणारे पंपगृह नदीत कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना व शेतकऱ्यांना पुढील दोन महिन्यांत जलसंकटाला समोर जावे लागण्याची शक्यता आहे.उजनी नदीपात्रात लाखो शेतकºयांचे कृषिपंप पाण्यामध्ये सोडलेले असायचे. मात्र, सध्या उन्हाळ्याला अवधी असतानाच कृषिपंप पाण्याविना उघडे पडायला लागले आहेत. त्यामुळे पंपांना नवीन जास्तीचे पाईप जोडणी करून नदीपात्रात दूरवर पाईपलाईन करावी लागत आहेत.यामध्ये इंदापूर तालुक्यातील शहा, तरडगाव, हिंगणगाव, कांदलगाव, माळवाडी, शिरसोडी, पिंपरी, पडस्थळ, आजोती, कालठण, गंगावळण, पळसदेव, तक्रारवाडी, भिगवण, डिकसळ यासह सुमारे ३० गावे पाणलोट क्षेत्रातील असून या व्यतिरिक्त काही गावे सोलापूर जिल्ह्यातील ही आहेत.आजचा उजनीचापाणीसाठा ( सद्य:स्थिती )एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर, एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी, टक्केवारी ३.८३ टक्के, एकूण टीएमसी ६५. ७१ असून त्यापैकी केवळ २.०५ टीएमसी उपयुक्त साठा आहे.विसर्ग ; बोगद्याद्वारे ६९० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे, दहिगाव उपसासिंचनमधून ९० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे, सीना माढा उपसासिंचनमधून २८० क्युसेक्सने, तर कालव्यामधून ३२०० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. त्यामुळे पाणीपातळी अजून खालावण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई