शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
3
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
4
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
5
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
6
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
7
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
8
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
9
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
10
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
11
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
12
जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
13
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
14
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
15
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
16
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
17
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
18
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
19
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
20
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाने गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 03:03 IST

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा ...

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे कृषी संपन्न असलेल्या इंदापूर तालुक्यातील जवळपास ३० गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उजनीतील पाण्याची पातळी दिवसोंदिवस खालावत असल्याने बागायती क्षेत्रातील एक लाख एकर शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. याचा परिणाम उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील व्यवसायांच्या अर्थकारणावर होणार आहे. येत्या दोन दिवसांत उजनी उणेमध्ये जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, व सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बागायती क्षेत्र याच उजनीमुळे समृद्ध झाला आहे. मात्र, यंदाच्या पावसाने ढील दिल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे धरणा काठावरील नागरिक, शेतकरी आणि विविध व्यावसायिक काळजीत पडले आहेत.इंदापूर तालुक्यातील एकूण बागायती शेतीचे क्षेत्र हे सुमारे ८० हजार ते १ लाख एकर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस, डाळींब, केळी, द्राक्ष, चिक्कू, आंबा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असून, ही गावे आर्थिक बाबतीत सक्षम बनली आहेत. मात्र, धरणाने तळ गाठल्याने हे व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.यापूर्वी २०१६ च्या दरम्यान उजनीच्या पाण्यात कमालीची घट झाली होती. त्यावेळी देखील पाण्याअभावी येथील शेती आणि व्यवसाय धोक्यात आले होते. त्यानंतर यावर्षी पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बºयाच गावांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास ३० गावांतील नळपाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचा पुरवठा दिसून येत नाही. उजनीची पाणीपातळी खालावल्याने अनेक गावांना उजनीमधून पाणीपुरवठा करणारे पंपगृह नदीत कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना व शेतकऱ्यांना पुढील दोन महिन्यांत जलसंकटाला समोर जावे लागण्याची शक्यता आहे.उजनी नदीपात्रात लाखो शेतकºयांचे कृषिपंप पाण्यामध्ये सोडलेले असायचे. मात्र, सध्या उन्हाळ्याला अवधी असतानाच कृषिपंप पाण्याविना उघडे पडायला लागले आहेत. त्यामुळे पंपांना नवीन जास्तीचे पाईप जोडणी करून नदीपात्रात दूरवर पाईपलाईन करावी लागत आहेत.यामध्ये इंदापूर तालुक्यातील शहा, तरडगाव, हिंगणगाव, कांदलगाव, माळवाडी, शिरसोडी, पिंपरी, पडस्थळ, आजोती, कालठण, गंगावळण, पळसदेव, तक्रारवाडी, भिगवण, डिकसळ यासह सुमारे ३० गावे पाणलोट क्षेत्रातील असून या व्यतिरिक्त काही गावे सोलापूर जिल्ह्यातील ही आहेत.आजचा उजनीचापाणीसाठा ( सद्य:स्थिती )एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर, एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी, टक्केवारी ३.८३ टक्के, एकूण टीएमसी ६५. ७१ असून त्यापैकी केवळ २.०५ टीएमसी उपयुक्त साठा आहे.विसर्ग ; बोगद्याद्वारे ६९० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे, दहिगाव उपसासिंचनमधून ९० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे, सीना माढा उपसासिंचनमधून २८० क्युसेक्सने, तर कालव्यामधून ३२०० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. त्यामुळे पाणीपातळी अजून खालावण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई