शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाने गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 03:03 IST

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा ...

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे कृषी संपन्न असलेल्या इंदापूर तालुक्यातील जवळपास ३० गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उजनीतील पाण्याची पातळी दिवसोंदिवस खालावत असल्याने बागायती क्षेत्रातील एक लाख एकर शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. याचा परिणाम उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील व्यवसायांच्या अर्थकारणावर होणार आहे. येत्या दोन दिवसांत उजनी उणेमध्ये जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, व सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बागायती क्षेत्र याच उजनीमुळे समृद्ध झाला आहे. मात्र, यंदाच्या पावसाने ढील दिल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे धरणा काठावरील नागरिक, शेतकरी आणि विविध व्यावसायिक काळजीत पडले आहेत.इंदापूर तालुक्यातील एकूण बागायती शेतीचे क्षेत्र हे सुमारे ८० हजार ते १ लाख एकर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस, डाळींब, केळी, द्राक्ष, चिक्कू, आंबा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असून, ही गावे आर्थिक बाबतीत सक्षम बनली आहेत. मात्र, धरणाने तळ गाठल्याने हे व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.यापूर्वी २०१६ च्या दरम्यान उजनीच्या पाण्यात कमालीची घट झाली होती. त्यावेळी देखील पाण्याअभावी येथील शेती आणि व्यवसाय धोक्यात आले होते. त्यानंतर यावर्षी पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बºयाच गावांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास ३० गावांतील नळपाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचा पुरवठा दिसून येत नाही. उजनीची पाणीपातळी खालावल्याने अनेक गावांना उजनीमधून पाणीपुरवठा करणारे पंपगृह नदीत कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना व शेतकऱ्यांना पुढील दोन महिन्यांत जलसंकटाला समोर जावे लागण्याची शक्यता आहे.उजनी नदीपात्रात लाखो शेतकºयांचे कृषिपंप पाण्यामध्ये सोडलेले असायचे. मात्र, सध्या उन्हाळ्याला अवधी असतानाच कृषिपंप पाण्याविना उघडे पडायला लागले आहेत. त्यामुळे पंपांना नवीन जास्तीचे पाईप जोडणी करून नदीपात्रात दूरवर पाईपलाईन करावी लागत आहेत.यामध्ये इंदापूर तालुक्यातील शहा, तरडगाव, हिंगणगाव, कांदलगाव, माळवाडी, शिरसोडी, पिंपरी, पडस्थळ, आजोती, कालठण, गंगावळण, पळसदेव, तक्रारवाडी, भिगवण, डिकसळ यासह सुमारे ३० गावे पाणलोट क्षेत्रातील असून या व्यतिरिक्त काही गावे सोलापूर जिल्ह्यातील ही आहेत.आजचा उजनीचापाणीसाठा ( सद्य:स्थिती )एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर, एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी, टक्केवारी ३.८३ टक्के, एकूण टीएमसी ६५. ७१ असून त्यापैकी केवळ २.०५ टीएमसी उपयुक्त साठा आहे.विसर्ग ; बोगद्याद्वारे ६९० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे, दहिगाव उपसासिंचनमधून ९० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे, सीना माढा उपसासिंचनमधून २८० क्युसेक्सने, तर कालव्यामधून ३२०० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. त्यामुळे पाणीपातळी अजून खालावण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई