शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

दुष्काळाने मारले आणि पाटबंधारेने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 02:25 IST

नीरा डाव्या कालव्यावरील ५७ नंबर वितरिकेतून आवर्तन

रेडणी : यंदा भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांना पिकांना मारले असताना पाटबंधारे विभागाच्या विभागाच्या अधिकाºयांनी केलेले काटेकोर नियोजन व पाणीचोरांवर ठेवलेला वचक यामुळे नीरा डाव्या कालव्याच्या ५७ व्या वितरिकेतून आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे माना टाकलेल्या पिकांना जिवदान मिळणार असून पीके तारली जाणार आहेत.या आवर्तनामुळे बोराटवाडी, खोरोची, रेडणी, माने वस्ती (निरवांगी) येथील शेतºयांना फायदा मिळत आहे. दुष्काळाचे गांभीर्य ओळखून आत्तापर्यंत सुरू असलेली पाणीचोरी रोखून वेगात सिंचन सुरू असल्यामुळे येथील शेतकरी समाधानी आहेत. यापूर्वी नीरा डावा कालव्याचे आवर्तन नेहमीच वादात राहिले आहे. मागील वर्षी धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा होता तरी देखील शेतकºयांना पाणी वेळेवर मिळाले नाही म्हणून पिके जळाली होती. पाणी चोरांमुळे जवळजवळ पन्नास टक्के पाणी चोरी जाऊन आवर्तन लांबत होते. आवर्तन लांबल्याने हेड व टेलच्या शेतकºयांमध्ये वादही निर्माण झाले होते, परंतु चालू आवर्तनामध्ये मात्र सायफन विरोधात पाटबंधारे विभागाने कंबर कसली आहे. आतापर्यंत सायफनमाफिया तुपाशी व सर्वसामान्य शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असायची, यावेळी मात्र सायफनधारकांवर जरब बसवण्यात पाटबंधारे विभाग यशस्वी ठरला आहे. चालू आवर्तनात वितरिका क्रमांक ५७ वरील दारे क्रमांक १९( बोराटवाडी) व दारे क्र. १८ (खोरोची) दोन्हीकडे पाणी पूर्ण क्षमतेने चालू होते.पाणीचोरी रोखून नीरा डावा कालव्याचे आवर्तन समाधानकारक वेगाने सुरू असल्याचे श्रेय पाटबंधारे विभाग, पोलिस प्रशासन व महावितरणचे कर्मचारी यांना संयुक्तपणे द्यावे लागेल अशी प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली. चालू आवर्तनात जेवढी पाण्याची बचत होईल तेवढे पाणी शेतकºयांना उन्हाळ्यात देता येईल, असेही ते म्हणाले.चोरी रोखल्याने दोन्ही दारे सुरूदोन्ही दारे चालू असण्याची गेल्या दहा वर्षातील ही पहिलीच वेळ हे केवळ पाणीचोरी रोखल्यामुळे शक्य झाले. पूर्ण क्षमतेने वितरिका सुरू आहे. ज्या क्षेत्राचे सिंचन व्हायला १५ दिवस लागायचे त्या क्षेत्राचे सिंचन केवळ सात दिवसात शक्य झाले, याचे श्रेय पाटबंधारे विभागाला द्यावेच लागेल.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी