शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पाणी प्यायला की सिंचनाला ? सिंचन पाणी कपातीने ग्रामीण भागात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:34 IST

पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे.

- विशाल शिर्केपुणे - पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे. पुण्याने आपला पाणीवापर मानकाप्रमाणे करावा, या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजादेखील ठोठावला आहे. प्रत्येक वेळी पाऊण लाख हेक्टर शेतीचे पाणी कमी करु देणार नाही, असे ठामपणे शेतकरी बोलू लागले आहेत.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ८९२ दशलक्ष लिटर (वार्षिक ११.५० टीएमसी) पाणी वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, २०११ ते २०१७ पर्यंत महापालिकेने १६ ते पावणेसतरा टीएमसी पाणीवापर केला आहे. तर, २०१७-१८ मध्ये १८.७१ टीएमसी इतका वार्षिक वापर झाला आहे. दुष्काळसदृश स्थिती आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश यामुळे अखेरीस महापालिका १३५० एमएलडी (वार्षिक १७.३९ टीएमसी) दैनंदिन पाणीवापरास तयार झाली. शहरासह लगतच्या गावांना खडकवासला धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणसाखळीतून पाणीपुरवठा होतो. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २९ टीएमसी आहे. ही धरणे मूळची सिंचनासाठी बांधलेली. शहराची गरज म्हणून महापालिकेशी जलसंपदा करार करते. त्यानुसार पावसाळा संपल्यानंतर कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यावर सिंचन, पाणी आणि उद्योगाला किती पाणी द्यायचे हे ठरते. वार्षिक ३ टीएमसीचे बाष्पीभवन गृहीत धरून नियोजन केले जाते. साधारण रब्बी आणि उन्हाळी अशी चार आवर्तने शेतीला देणे अपेक्षित आहे.महापालिकेने पाण्याची गळती ३५ वरून १५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविता येऊ शकते. तसेच, शेतीसाठी देखील यापुढे ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा लागेल. तरच, महापालिका आणि शेतीसाठी पाण्याचा समतोल राखला जाऊ शकतो.- जलसंपदा विभागपुणे महापालिका मापदंडानुसार पाणीवापर नसल्याने सिंचनाच्या पाण्यावर ताण येत आहे. उपलब्ध पाण्यानुसार दरवर्षी पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार रब्बीत दोन आणि उन्हाळ्यात दोन आवर्तन देणे अपेक्षित आहे. शहराचा पाणीवापर सातत्याने वाढल्यास ते शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकेने मापदंडानुसार पाणी वापरावे, अशी आमची मागणी आहे. महापालिकेने गळती कमी केल्यास आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.- विठ्ठल जराड, याचिकाकर्ते शेतकरी, बारामती

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे