शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पाणी प्यायला की सिंचनाला ? सिंचन पाणी कपातीने ग्रामीण भागात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:34 IST

पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे.

- विशाल शिर्केपुणे - पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे. पुण्याने आपला पाणीवापर मानकाप्रमाणे करावा, या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजादेखील ठोठावला आहे. प्रत्येक वेळी पाऊण लाख हेक्टर शेतीचे पाणी कमी करु देणार नाही, असे ठामपणे शेतकरी बोलू लागले आहेत.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ८९२ दशलक्ष लिटर (वार्षिक ११.५० टीएमसी) पाणी वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, २०११ ते २०१७ पर्यंत महापालिकेने १६ ते पावणेसतरा टीएमसी पाणीवापर केला आहे. तर, २०१७-१८ मध्ये १८.७१ टीएमसी इतका वार्षिक वापर झाला आहे. दुष्काळसदृश स्थिती आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश यामुळे अखेरीस महापालिका १३५० एमएलडी (वार्षिक १७.३९ टीएमसी) दैनंदिन पाणीवापरास तयार झाली. शहरासह लगतच्या गावांना खडकवासला धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणसाखळीतून पाणीपुरवठा होतो. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २९ टीएमसी आहे. ही धरणे मूळची सिंचनासाठी बांधलेली. शहराची गरज म्हणून महापालिकेशी जलसंपदा करार करते. त्यानुसार पावसाळा संपल्यानंतर कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यावर सिंचन, पाणी आणि उद्योगाला किती पाणी द्यायचे हे ठरते. वार्षिक ३ टीएमसीचे बाष्पीभवन गृहीत धरून नियोजन केले जाते. साधारण रब्बी आणि उन्हाळी अशी चार आवर्तने शेतीला देणे अपेक्षित आहे.महापालिकेने पाण्याची गळती ३५ वरून १५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविता येऊ शकते. तसेच, शेतीसाठी देखील यापुढे ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा लागेल. तरच, महापालिका आणि शेतीसाठी पाण्याचा समतोल राखला जाऊ शकतो.- जलसंपदा विभागपुणे महापालिका मापदंडानुसार पाणीवापर नसल्याने सिंचनाच्या पाण्यावर ताण येत आहे. उपलब्ध पाण्यानुसार दरवर्षी पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार रब्बीत दोन आणि उन्हाळ्यात दोन आवर्तन देणे अपेक्षित आहे. शहराचा पाणीवापर सातत्याने वाढल्यास ते शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकेने मापदंडानुसार पाणी वापरावे, अशी आमची मागणी आहे. महापालिकेने गळती कमी केल्यास आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.- विठ्ठल जराड, याचिकाकर्ते शेतकरी, बारामती

टॅग्स :WaterपाणीDamधरणPuneपुणे