शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 9:00 PM

1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प

ठळक मुद्दे विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड

नम्रता फडणीसपुणे: ' मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून जन्मालो आलो. पण हिंदू म्हणून मरणार नाही, हे उदगार आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. धर्मांतराच्या  भीमगर्जनेनंतर 1956 मध्ये बाबासाहेबांनी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्मांतराचा साहित्य विश्वावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्याविषयी अनेक कवी विविध अंगांनी शब्दबद्ध झाले..या विषयावरील 1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प बोधी नाट्य परिषदेने हाती घेतला आहे.' बोधी शतक' या नावाने आकाराला येत असलेला हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरणार आहे.   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांना ख्रिश्चन, मुस्लिम, शीख धर्माच्या धर्मगुरूंकडून आपल्या धर्मात येण्यासंबंधी विनंती करण्यात आली. मात्र बाबासाहेबांनी जातीभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणा-या, मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणाऱ्या बौद्ध  धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या धर्मांतरानंतर सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक स्तरावर  परिवर्तन घडले. गेल्या 64 वर्षात कविता कशी बदलत गेली.  याबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहण्याचा कवींचा  दृष्टीकोन कसा होता? म्हणजे श्रद्धा,   देवत्वच्या भावनेने  की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मांडणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे  पाहिले गेले याचा शोध घेण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर,  बुद्ध आणि बौद्ध धर्म यांच्या विचारांच्या  काव्यात्मक अभिव्यक्तीचा धांडोळा या प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती  प्रकल्प समन्वयक आणि  नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.   ते म्हणाले, या प्रकल्पात 1956 ते 2019 पर्यंत डॉ आंबेडकर यांच्याविषयीच्या कवितांचा परामर्श घेण्यात आला आहे. विशिष्ट जाती, पंथ, धर्माच्या पलीकडे जाऊन कवितांचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे बा.सी मर्ढेकर, राजानंद गडपायले, सुरेश भट, यशवन्त मनोहर, कवी ग्रेस यांपासून ते नंतरच्या काळातील  रवींद्र लाखे, मीनाक्षी पाटील, नीरजा, आशालता कांबळे, चेतन पिंपळापुरे अशा अनेक कवींच्या कवितांचा समावेश यात करण्यात आला आहे. कवी ग्रेस यांच्यासारख्या अनेक कवींच्या कविता थेट विषयाला भिडणाऱ्या नसल्या तरी त्यांच्या विचारांचा आशय समजून घेत अशा शंभर कवींची प्रकल्पासाठी  निवड करण्यात आली आहे. निवडीचे काम पूर्ण झाले असून, प्रस्तावना लिहिण्याचे काम सुरू आहे. एका कवितेबद्दल दोन विभिन्न प्रकारचे दृष्टीकोन असू शकतात..म्हणून दोन प्रस्तावना देण्यात येणार आहेत. टाळेबंदी हटल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल.

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य