शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:48 IST

अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले.

    - प्रविण गायकवाड

आपण सारेच Quarantined आहोत. मी आणि माझा मुलगा पृथ्वीराज आज अकलूजच्या घरी असताना आम्ही dynamic personality डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत होतो. तो सध्या  ‘Regents University London’ येथे उच्च शिक्षण घेतोय परंतु महामारीमुळे तो सध्या भारतात आहे. त्याच्या पदवी शिक्षणानंतर त्याने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे असं मी त्याला उङ्मल्ल५्रल्लूी करत होतो पण त्याची तशी तयारी नव्हती. गेल्या वर्षी एका दिवशी तो सहज मला अनेक प्रश्न विचारु लागला, बाबासाहेबांबद्दल, संविधान, अधिकार, आंबेडकरांचे शिक्षण, इत्यादी गोष्टींवर आम्ही दोघांनी चर्चा केली. मी त्याला सांगितलं की बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून शिक्षण घेतलं आहे. पृथ्वीराज त्यावर म्हणाला,म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून न्याय व हक्क दिले अन् त्याचा फायदा करोडो लोकांना झाला. पुढे तो म्हणाला, मला ही लंडनला Masters साठी जायचंय. हे ऐकताच मला आश्चर्य वाटलं पण आनंद याचा झाला की तो बाबासाहेबांना आदर्श मानून त्यांची प्रेरणा घेऊन लंडनला शिकायला गेला. 

तसेच संविधानाचे अधिकार याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. त्याबद्दल अधिकाधिक चिंतन होणं गरजेचं आहे. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते... ती म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम पुतळा हा ९ डिसेंबर १९५० रोजी कोल्हापूर येथील बिंदू चौकात बसवला गेला. अजून चांगलं म्हणजे करवीर नगरीत त्यांच्या पुतळ्यासमवेत त्यांचे गुरु महात्मा फुले यांचाही पुतळा त्याचवेळेस बसवला गेला. पुढच्या काळात बाबासाहेब हे बेळगाव येथे जात असताना त्यांनी त्यांच्या पुतळ्याला भेट दिली. हे दोन्ही पुतळे भाई माधवराव बागल यांनी उभारले. ते शाहू महाराजांचे अनुयायी होते. त्या अगोदर जेव्हा २३ वर्षीय बाबासाहेब परदेशातून शिकून आले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला बोलवून हत्तीवरुन मिरवणूक काढून साखऱ्या वाटप केले व त्यांचा मोठा सन्मान केला. तसेच माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद घेण्यात आली होती.अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले.

तसेच संविधानाचे अधिकार याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. त्याबद्दल अधिकाधिक चिंतन होणं गरजेचं आहे. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते... ती म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम पुतळा हा ९ डिसेंबर १९५० रोजी कोल्हापूर येथील बिंदू चौकात बसवला गेला. अजून चांगलं म्हणजे करवीर नगरीत त्यांच्या पुतळ्यासमवेत त्यांचे गुरु महात्मा फुले यांचाही पुतळा त्याचवेळेस बसवला गेला. पुढच्या काळात बाबासाहेब हे बेळगाव येथे जात असताना त्यांनी त्यांच्या पुतळ्याला भेट दिली. हे दोन्ही पुतळे भाई माधवराव बागल यांनी उभारले. ते शाहू महाराजांचे अनुयायी होते. त्या अगोदर जेव्हा २३ वर्षीय बाबासाहेब परदेशातून शिकून आले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला बोलवून हत्तीवरुन मिरवणूक काढून साखर वाटप केले व त्यांचा मोठा सन्मान केला. तसेच माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद घेण्यात आली होती. अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  Scheduled Caste व Scheduled Tribes साठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी प्रथम गोलमेज परिषदेत केली. ब्रिटिश सरकारला पटवून त्यांनी ते अधिकार मिळवले.  परंतु महात्मा गांधी यांनी त्या विरोधात उपोषण केले व दोघांच्या चर्चेनंतर ह्यपुणे करारह्ण करण्यात आला. हाच मुद्दा पुढे १९८० ला कांशीराम यांनी उचलला अन् पुणे करार, धिक्कार करार! असा नारा दिला. बाबासाहेबांना प्रेरणा मानून कांशीराम यांनी चळवळ उभी करुन  ‘Backward & Minority Communities Employees Federation (BAMCEF)’ ची स्थापना केली. त्यांचे मार्गदर्शक डी. के. खापर्डे यांना ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी येथे शिवजयंती व भीमजयंती साजरी करायला संघर्ष करावा लागला. कांशीराम यांना पुढे सरकारी कामातून बडतर्फ करण्यात आलं. मग डी. के. खापर्डेंनी त्यांना महात्मा फुले व बाबासाहेबांची काही पुस्तकं दिली. त्यात त्यांनी ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक वाचून प्रेरीत झाले व तिथून पुढे संपूर्ण आयुष्य कांशीराम यांनी सामाजिक कार्यासाठी घालवले. ते आंबेडकरांच्या तत्वावर चालून पुढे यशस्वी राजकारणी झाले. खऱ्या अर्थाने ‘Politics is Master Key’ हे त्यांना समजले होते. 

कांशीराम, डी के खापर्डे, बाबासाहेबांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनी बाबासाहेबांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. मला यानिमित्ताने वामन मेश्राम यांचेही धन्यवाद मानायचे आहेत. कारण BAMCEF सोबत माझी जवळीक आहे. तसेच बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जपणारे प्रा. मा म देशमुख, डॉ. आ. ह. साळुंखे, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, अविनाश म्हातेकर, रमेश राक्षे, इत्यादी लोकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. 

गेल्यावर्षी मी, रोहितदादा पवार व प्रज्ञेश मोळक (साकू), आम्ही कोल्हापूरला गेलो असता बिंदू चौकात जाऊन बाबासाहेबांच्या जगातील प्रथम पुतळ्यास वंदन केले. तेथील हा फोटो आहे. शेवटी एकच की बाबासाहेबांना सामाजिक समता प्रस्थापित करायची होती अन् ती त्यांनी केली परंतु त्यांची एक खंत विसरता कामा नये ती म्हणजे त्यांना  ‘Real Representation’ हवे होते व खरे प्रतिनिधी निवडून पाठवायचे होते अन् त्याचबरोबर आर्थिक समानता या देशात त्यांना आणायची होती. मात्र ते काही झालं नाही. हीच खंत मनात बाळगून आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यावर विचार करुया, चिंतन करुया अन् बाबासाहेबांच्या विचारांवर चालूया..!

                                                                                                                                         (लेखक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)                                                                                                                              

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडpravin gaikwadप्रवीण गायकवाडDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर