शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

सरकार मायबापा...आता पुन्हा लॉकडाऊन नको! हातावर पोट असणाऱ्या बांधवांची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:25 IST

देशात संचारबंदी लागू झाल्यावर सर्वात जास्त फटका सरबत, उसाचे गुऱ्हाळ, खाद्यपदार्थ , चहा, चणे- फुटाणे विक्रेते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसला आहे. व्या

ठळक मुद्देकोरोना संचारबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने साधला छोट्या व्यावसायिकांशी संवाद 

अतुल चिंचली- 

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आमच्या सारख्या व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांपासून सर्व काही पूर्वपदावर आले आहे. परंतु आमच्या व्यवसायाला अजूनही चालना मिळाली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आम्हाला पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीतीच वाटू लागली आहे, पण सरकार मायबापा...पुन्हा लॉकडाऊन नको! असे कळकळीची विनंती व्यावसायिकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

देशात संचारबंदी लागू झाल्यावर सर्वात जास्त सरबत, उसाचे गुऱ्हाळ, चांबार, खाद्यपदार्थ गाडी चालवणारे, स्टॉलवरील चहा विक्रेते, चणे फुटाणे विक्रेते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसला आहे. 

ही लोक महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबरच पराराज्यातून पुण्यात व्यवसाय करण्यासाठी येत असतात. लहान व्यवसायातून त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो.  परंतु अशा अचानक ओढवलेल्या संकटाने त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच त्यांच्या डोक्यावरील कर्जही वाढत जाते. व्यवसाय पूर्वपदावर येत असताना डोक्यावरील कर्ज कमी होण्याबरोबरच पोटापाण्याचे प्रश्न सुटू लागतात. परंतु कोरोनाचे सावट अजून असल्याने त्यांच्या मनातील भीती वाढत चालली आहे. 

फळ आणि भाजी विक्रेत्या सुरेखा शिंदे म्हणाल्या, मागच्या वर्षी आमच्यावर कोरोनामुळे गावी जाण्याची वेळ आली. गावी जाऊन राशन भरण्यासाठी आम्हाला कर्ज काढावे लागले. जवळपास सात महिने आर्थिक चणचण भासत होती. त्यामध्ये मला मधुमेहाचा त्रास सुरू झाला. दवाखान्याच्या खर्चही वाढत गेला. महिन्याभराच्या कमाईत ६० टक्के घट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये असेच आमचे म्हणणे आहे. .........................

कोरोनाच्या संचारबंदीत काही महिने  व्यवसाय बंद झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले. काही महिन्यांनी हळूहळू पूर्वपदावर येत असताना लॉकडाऊन जर जाहीर झाला तर जगणे कठीण होईल.  राजू वरछाये,  चांभार

..........उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण मागच्या वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. वर्षभरात ३ ते ४ लाख रुपयांचा व्यवसाय होतो. पण गेल्या वर्षी तर कर्जाचा डोंगरच उभा राहिला.कोरोना संकट पुन्हा घोंघावू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. पांडुरंग फडतरे,  उसाचा रस विक्रेते 

....................संचारबंदीपासून आठ महिने व्यवसाय बंद होता. लाईट बिल, घरभाडे सर्व काही थकीत होते. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्वी महिन्याला ८ ते १० हजार रुपये सुटत होते. पण आता ५ हजारही मिळणे अवघड झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने हे घडत आहे. सरकारने लॉकडाऊनचा विचारही करू नये, असे आमचे मत आहे. ज्ञानेश्वर सुपेकर, लिंबू सरबत, विक्रेते

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसbusinessव्यवसाय