शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सरकार मायबापा...आता पुन्हा लॉकडाऊन नको! हातावर पोट असणाऱ्या बांधवांची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:25 IST

देशात संचारबंदी लागू झाल्यावर सर्वात जास्त फटका सरबत, उसाचे गुऱ्हाळ, खाद्यपदार्थ , चहा, चणे- फुटाणे विक्रेते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसला आहे. व्या

ठळक मुद्देकोरोना संचारबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने साधला छोट्या व्यावसायिकांशी संवाद 

अतुल चिंचली- 

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आमच्या सारख्या व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांपासून सर्व काही पूर्वपदावर आले आहे. परंतु आमच्या व्यवसायाला अजूनही चालना मिळाली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आम्हाला पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीतीच वाटू लागली आहे, पण सरकार मायबापा...पुन्हा लॉकडाऊन नको! असे कळकळीची विनंती व्यावसायिकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

देशात संचारबंदी लागू झाल्यावर सर्वात जास्त सरबत, उसाचे गुऱ्हाळ, चांबार, खाद्यपदार्थ गाडी चालवणारे, स्टॉलवरील चहा विक्रेते, चणे फुटाणे विक्रेते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसला आहे. 

ही लोक महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबरच पराराज्यातून पुण्यात व्यवसाय करण्यासाठी येत असतात. लहान व्यवसायातून त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो.  परंतु अशा अचानक ओढवलेल्या संकटाने त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच त्यांच्या डोक्यावरील कर्जही वाढत जाते. व्यवसाय पूर्वपदावर येत असताना डोक्यावरील कर्ज कमी होण्याबरोबरच पोटापाण्याचे प्रश्न सुटू लागतात. परंतु कोरोनाचे सावट अजून असल्याने त्यांच्या मनातील भीती वाढत चालली आहे. 

फळ आणि भाजी विक्रेत्या सुरेखा शिंदे म्हणाल्या, मागच्या वर्षी आमच्यावर कोरोनामुळे गावी जाण्याची वेळ आली. गावी जाऊन राशन भरण्यासाठी आम्हाला कर्ज काढावे लागले. जवळपास सात महिने आर्थिक चणचण भासत होती. त्यामध्ये मला मधुमेहाचा त्रास सुरू झाला. दवाखान्याच्या खर्चही वाढत गेला. महिन्याभराच्या कमाईत ६० टक्के घट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये असेच आमचे म्हणणे आहे. .........................

कोरोनाच्या संचारबंदीत काही महिने  व्यवसाय बंद झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले. काही महिन्यांनी हळूहळू पूर्वपदावर येत असताना लॉकडाऊन जर जाहीर झाला तर जगणे कठीण होईल.  राजू वरछाये,  चांभार

..........उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण मागच्या वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. वर्षभरात ३ ते ४ लाख रुपयांचा व्यवसाय होतो. पण गेल्या वर्षी तर कर्जाचा डोंगरच उभा राहिला.कोरोना संकट पुन्हा घोंघावू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. पांडुरंग फडतरे,  उसाचा रस विक्रेते 

....................संचारबंदीपासून आठ महिने व्यवसाय बंद होता. लाईट बिल, घरभाडे सर्व काही थकीत होते. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्वी महिन्याला ८ ते १० हजार रुपये सुटत होते. पण आता ५ हजारही मिळणे अवघड झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने हे घडत आहे. सरकारने लॉकडाऊनचा विचारही करू नये, असे आमचे मत आहे. ज्ञानेश्वर सुपेकर, लिंबू सरबत, विक्रेते

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसbusinessव्यवसाय