शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

'' यांना '' राज्याचं नागरी वाहतूक धोरण माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:00 IST

कामावर गेलेली माणसं आणि शाळेत गेलेली मुलं घरी कधी परतणार आणि कोणत्या अवस्थेत, याची चिंता प्रत्येक पुणेकराला आहे...

ठळक मुद्देयंदाच्या पावसाळ्यात तर वाहतूककोंडीच्या संकटाने अनेकांचा घेतला बळी घेतला कधी बदलणार हे चित्र? कोण बदलणार? निवडणुकीत या प्रश्नांची चर्चा होणार नाही तर कधी..?

चला रे चला, निवडणूक आली! आपले कारभारी निवडून द्यायची वेळ आली! वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आता आपल्याशी संपर्क साधतील. आपल्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतील. त्यांच्या मनातले प्रकल्प आपल्यासमोर मांडतील. हे प्रकल्प अर्थातच भव्यदिव्य असतील. पण, हे प्रकल्प खरंच आपल्याला उपयोगी पडणार आहेत का, असेच प्रकल्प यापूर्वी केले तेव्हा आपल्या समस्या सुटल्या का, याबद्दल त्यांना प्रश्न विचारायची हीच ती वेळ, हाच तो क्षण!

पुण्यासकट भारतातल्या जवळपास सगळ्या शहरांमधल्या तीन प्रमुख समस्या आहेत- पाणी, कचरा आणि वाहतूक. त्यांचा नंबर आपापसांत वर-खाली होत असेल, एवढंच. या लेखमालेत आपण त्यातील वाहतुकीच्या समस्येच्या अनुषंगाने आपल्या उमेदवारांसाठी काही प्रश्न उपस्थित करणार आहोत. त्याची सुरुवात आज ‘पाया’पासून करू. शहरी वाहतूक, नगररचना हे राज्य सरकारच्या अखत्यारीतले विषय आहेत. या विषयांमध्ये गेल्या १५-२० वर्षांमध्ये जगभर एक क्रांतीच होते आहे. मोटारीचा शोध लागल्यावर आणि त्या सामान्यांच्या आवाक्यात आल्यावर ७०-८० वर्षांमध्ये जगभरच्या शहरांना वाहतूककोंडी, प्रदूषण, अपघात या समस्यांचा विळखा बसला. हे प्रश्न सोडवायचे आपले मार्गच चुकताहेत, असं लक्षात आल्यावर अनेक शहरं त्यावर आता एकदम ‘हटके’ असे उपाय अमलात आणताहेत. सुदैवाची गोष्ट अशी, की भारताने आणि महाराष्ट्रानेही त्याबाबत काही चांगली पावलं टाकली आहेत. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या नगरविकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेला ‘महाराष्ट्र राज्य नागरी वाहतूक धोरणा’चा मसुदा.

अगदी थोडक्यात सांगायचं, तर या मसुद्यानुसार शहरी वाहतुकीचं नियोजन करताना पादचारी, सार्वजनिक वाहतूक आणि सायकली यांच्या सोयींवर भर द्यायचा आहे. त्याबरोबरच, खासगी वाहतुकीला उत्तेजन देणारे उड्डाणपूल, स्वस्त/ मुबलक पार्किंग असे प्रकल्प उभारणं थांबवायचं आहे. तत्त्वत: सगळ ं चांगलं आहे; पण... आणि हा ‘पण’ फारच महत्त्वाचा आहे. आपल्या मतदारसंघामधल्या इच्छुकांनी आणि उमेदवारांनी हा मसुदा वाचला आहे का? ते देत असलेली आश्वासनं या मसुद्यानुरूप आहेत का? हा मसुदा प्रसिद्ध करून आता दोन वर्षं झाली. राज्याच्या अधिकृत धोरणात त्याचं रूपांतर व्हायला इतका वेळ का लागतोय? तोही गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असताना? -हर्षदअभ्यंकर ँं१२ँं.िुंँ८ंल्ल‘ं१@२ं५ीस्र४ल्ली३१ाां्रू.ङ्म१ॅ ............ आपल्याला याबाबत काय करता येईल? अगदी सोपं आहे! आपले उमेदवार (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) आपल्याला भेटायला आले, की त्यांना दोनच प्रश्न विचारायचे - ४पुण्यामध्ये चालत, बसने आणि सायकलने सहजपणे आणि सुरक्षितपणे वावरता यावं म्हणून तुम्ही कोणते मोठे प्रकल्प आणलेत? (हो, मोठे प्रकल्प. ‘मी एक बस दिली, एक किलोमीटरचा पदपथ बनवला’ असा देखावा नव्हे!) ४ते करतानाच खासगी वाहनं वापरणं हळूहळू अवघड होत जाणं आवश्यक आहे; त्यासाठीही तुम्ही काय केलंत? ........

आमदार इच्छुकांना हे प्रश्न विचार मतदारराजा!

1 सुरक्षित रस्ते, पदपाथ उपलब्ध होणे हा नागरिकांचा हक्क आहे की नाही?

2 भावी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही यासाठी काय करणार?

3 खड्डेयुक्त रस्त्ङ्क्तो, रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे रस्ते सुरक्षित राहिलेले नाहीत. लोकांचे हकनाक बळी जातात, याची जबाबदारी कोण घेणार?

4 पावसाच्या पाण्याने रस्त्यांच्या नद्या होतात. मैैलापाण्याने रस्ते तुंबतात. त्यात गाड्या वाहून जातात. माणसेही वाहून चालली आहेत. पुण्यातले रस्ते सुरक्षित नसावेत, याची चिंता वाटून हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही आजवर काय केले?

5 स्वत:ची अलिशान वाहने बाजूला ठेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर तुम्ही स्वत: किती नियमितपणे करता? त्याची गरज तुम्हाला वाटते की नाही.

..........

 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिसGovernmentसरकारAccidentअपघात