शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 03:09 IST

डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही.

पुणे - डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही. तसेच डेंग्यूला घाबरून जाण्याची गरज नाही. पुरेशी विश्रांती, सकस आहार व भरपूर पाणी यामुळे डेंग्युला रोखणे शक्य आहे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.पूना सिटीजन डॉक्टर फोरम (पीसीडीएफ) आणि सार्थक वेलफेअर फाउंडेशनतर्फे ‘डेंग्यू : समज व गैरसमज’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. भरत पुरंदरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘पीसीडीएफ’च्या समन्वय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अरुण गद्रे, आनंद आगाशे, रवींद्र गोरे, सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर स्वाती नामजोशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अनंत फडके यांनी त्यांच्याशी संवाद साधला.डॉ. भोंडवे म्हणाले, तीव्र ताप आणि अंगदुखी हे डेंग्यूचे लक्षण आहे. पण यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही. मागील १० वर्षांत माझ्याकडे आलेला एकही रुग्ण डेंग्यूमुळे दगावलेला नाही. त्यामुळे डेंग्यूला घाबरण्याची अजिबात गरज नाही. केवळ प्राथमिक औषधोपचाराने ९० टक्के रुग्ण बरे होतात.काही रुग्ण भीतीमुळे रुग्णालयात भरती होण्याचा आग्रह करतात. आयुर्वेद हे चांगले शास्त्र असले तरी काही बाबींचे केवळ मार्केटिंग केले जात आहे.प्लेटलेट्सला अवास्तव महत्त्वप्लेटलेट्सला अवास्तव महत्त्व दिले जात असल्याचे डॉ. पुरंदरे यांनी स्पष्ट केले. प्लेटलेट्स कमी होणे हे डेंग्यूचे लक्षण असले तरी त्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. सामान्यपणे प्लेटलेट्सची संख्या दहा हजार होईपर्यंत आम्ही बाहेरून प्लेटलेट देण्याचा सल्ला देत नाही. त्याचे आयुष्य १-२ दिवसाचेच असते.योग्य आहार, भरपूर पाणी, विश्रांती आणि औषधोपचारामुळे प्लेटलेट्स वाढतात. पण प्लेटलेट्स जर एकाच दिवशी ५० हजाराने कमी होत असतील तर चिंतेची बाब आहे. रुग्ण दगावण्यामागे काहीवेळा इतर आजारही कारणीभुत ठरतात. डेंग्यू हे केवळ निमित्त असते. पपईमुळे प्लेटलेट्सचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असले तरी ते योग्य आहार घेतल्यानेही वाढते.डॉक्टर सांगतात...डेंग्यूला घाबरू नकाविश्रांती, आहार व भरपूर पाणी घ्याअ‍ॅन्टीबायोटिकघेण्याची गरज नाहीडॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार, तपासण्या करा९० टक्के पेशंट नियमित औषधाने होतात बरेप्लेटलेट्सलाअवास्तव महत्त्व नको

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdocterडॉक्टर