शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सावळा गोंधळ..! धरणग्रस्ताला दोनवेळा पुनर्वसनाच्या जमिनीचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:20 IST

जिल्हा प्रशासनाने एका धरणग्रस्ताला एकदा नाही तर दोन वेळा पुनर्वसनाची जमीन दिल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमहसूल मंत्र्यांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रसुमारे एक महिना होवूनही या प्रकरणी आवश्यक कार्यवाही नाही

पुणे: धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात जिल्हा प्रशासनाकडून अनेक वर्षांचा कालावधी लावला जातो.परिणामी धरणग्रस्तांना शासकीय कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात.मात्र,जिल्हा प्रशासनाने एका धरणग्रस्ताला एकदा नाही तर दोन वेळा पुनर्वसनाची जमीन दिल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी महसूल मंत्र्यांकडे तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिका-यांनी तक्रारदाराला पाठविले आहे.  वढु बुद्रुक येथील शेतकरी पांडुरंग पांडे यांनी एकाच धरणगस्ताला शासनाची जमीन दोन वेळा देण्यात आली असून त्याची चौकशी करावी, असे निवेदन कागदपत्रांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश बापट यांना दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मात्र,सुमारे एक महिना होवूनही या प्रकरणी आवश्यक कार्यवाही होत नसल्याचे पांडे यांनी सांगितले.  चासकमान धरणात जमिन गेल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे एका धरणग्रस्ताला वढू बुद्रुक या गावात जमीन देण्यात आली.मात्र,संबंधित जमिनीमुळे वाद होत असल्याने त्याने दुस-या ठिकाणी जमिनीची मागणी केली.त्यावर जिल्हा प्रशासनाने संबंधित धरणग्रस्ताला दुस-या ठिकाणी जमीन दिली.मात्र,पूर्वीची जमीन जिल्हा प्रशासनाने ताब्यात न घेतल्याने संबंधित धरणग्रस्ताने ही जमीन परस्पर विकून टाकली. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी पांडे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDamधरणChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील