शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खरपुडी ट्रस्टी आणि ग्रामस्थांचा वाद; चैत्र पोर्णिमा यात्रा भरली मात्र भाविकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:15 IST

गेल्या दोन वर्षापासून ट्रस्टी व ग्रामस्थाच्या वादामुळे जवळपास १८ लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहे

राजगुरुनगर: कुलदैवत खरपुडी खुर्द (ता खेड ) येथील (दि २३ ) चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडेरायाची यात्रा भरली मात्र देवस्थान ट्रस्टीचा वाद मिटत नसल्यामुळे सुमारे नऊ लाख रुपये उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून ट्रस्टी व ग्रामस्थाच्या वादामुळे जवळपास १८ लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहे.

 खरपुडी येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडोबाची यात्रा भरली होती. प्रति जेजुरी म्हणून हा खंडोबा राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. गेल्या दोन वर्षापासून देवस्थान ट्रस्टमध्ये वाद सुरू आहे. देवस्थानमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष मुदत संपली ही तरीही राजीनामा देत नसल्यामुळे ग्रामस्थांनी वेगळी ट्रस्ट व्हावी म्हणून गावतील दोन गटानी धर्मदाय आयुक्त कडे अर्ज केले होते. काही केल्यानेही वाद मिटत नसल्यामुळे धर्मदाय आयुक्ताने भाविकांकडून देणगी पावती स्वरूपात घेऊ नये. मंदिरात दानपेट्या ठेवू नये असा मनाई आदेश दिला आहे. मागील वर्षीही असाच मनाई आदेश होता. त्यावेळी अंदाजे  ९ लाखाचे नुकसान झाले होते. यंदा पुन्हा अंदाजे ९ लाख रुपयाचे नुकसान होणार आहे. गावातील ऐकमेकांची जिरावा जिरवीच्या राजकारणात खरपुडीचा खंडोबा देव वेठीस धरला आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. मंगळवारी दि २३ रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त देवाची यात्रा भरली होती मात्र सकाळपासून ट्रस्टी मंडळ व नवीन अर्जदार ट्रस्ट मंडळ कोणीही मंदिरावर फिरकले नाही.वादामुळे भाविकांची मोठी गैरसोय होऊन नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :PuneपुणेKhandoba Yatraखंडोबा यात्राTempleमंदिरSocialसामाजिकsarpanchसरपंच