शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

'माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस चर्चा', सुप्रिया सुळेंचे खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 11:06 IST

माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता असून मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते

इंदापूर : बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक हा भातुकलीचा खेळ करुन टाकला आहे. माझी लढाई वैयक्तिक कुणाशी ही नाही. राजकीय, वैचारिक लढाई आहे. माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस, त्या जागेवर व कोणत्या ही व्यासपीठावर येऊन चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे खुले आव्हान खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि.२२) शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.    संविधानाची अंमलबजावणी जेथे होते ते मंदीर म्हणजे संसद आहे. त्यामुळे तुम्ही बारामतीची निवडणूक हलक्यात घेता, तशी ती हलक्यात घेत नाही. माझ्या विरोधात उभे राहिल हे मला माहिती नाही. त्याचे उत्तर महायुतीच देईल. लोकशाहीत दोन वेगळे विचार मांडण्यात येत आहेत. माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता आहे. मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते,असे ही त्या म्हणाल्या.    मराठा, धनगर, लिंगायत ,मुस्लिम भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या खुप वर्षापासूनच्या मागण्या आहेत. आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन असंवेदनशील आहे. खोट बोल पण रेटून बोल असा प्रकार करत आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकारची आरक्षणाबाबतची जी भूमिका आहे ती अतिशय फसवी व दुर्देवी आहे. या मध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे, असे सुळे म्हणाल्या. दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. तीनशे खासदार,दोनशे आमदार असे पाशवी बहुमत असताना आरक्षणाबाबत ते कसला ही निर्णय घेत नाही. जरांगे-पाटलांसारखा माणूस आंदोलने करतो. त्यावेळी मंत्री त्यांना भेटायला जातात. मात्र प्रश्न सुटत नाही. सरकार जरांगे व मराठी माणसांची फसवणूक करत आहे. जरांगे यांना सतत आंदोलने का करावी लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  भाजपमध्ये सध्या इनकमिंगला महत्व आहे. तुम्ही भ्रष्टाचार करा लगेच आम्ही आरोप करणार. दुस-या दिवशी तुमचा पक्षप्रवेश घेणार. चौथ्या दिवशी तुम्हाला एक मोठे पद देणार ही त्यांची सध्याची आदर्श पॉलीसी ठरली आहे. 'भ्रष्टाचारमुक्त भारत', 'न खाऊंगा न खाने दुंगा'चे काय झाले देवालाच ठाऊक अश्या शब्दात सरकारचे वाभाडे काढत त्या म्हणाल्या की, विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोठी आंदोलने उभारणारे प्रकाश जावडेकर, २०१४ मध्ये भाजप सत्तेत यावा यासाठी याच्यासाठी झटणा-या, खुर्च्या, सतरंजा उचलणा-या माधव भंडारींसारख्या कार्यकर्त्यांना काय मिळाले. ते ज्यांच्याशी लढले ते सत्तेच्या पंक्तीत चांदीच्या ताटात जेवत आहेत. भाजपला सत्तेवर आणण्यासाठी पराकाष्ठा करणा-या गोपीनाथ मुंडे  कुटुंबाकडे लक्ष द्यायला आत्ता सरकारला वेळ नाही. १०५ आमदार निवडून आणणा-या देवेंद्र फडणवीसांनी होते. ४० आमदारांच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच गडकरी मुंडे देवेंद्र फडणवीस या मराठी माणसांचा द्वेष करते असा घणाघात खा. सुळे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारण