शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

रविवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 20:01 IST

आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक ही डाव आत्तापर्यंत आपण यशस्वी होऊ दिला नाही....

- शैलेश काटे

इंदापूर (पुणे) : रविवारी (दि. २२) बैठक घेऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आजवरच्या शांततेच्या युध्दानेच सरकार जेरीस आलेले आहे. त्यामुळे उग्र आंदोलन करु नका. आरक्षणासाठी आत्महत्या करु नका. मंडळनिहाय गावात जावून जागृती करा, असे आवाहन मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. २१) प्रशासकीय भवनाशेजारच्या पटांगणात झालेल्या विराट सभेत केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ते म्हणाले की, आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी सरकारच्या आवाहननुसार आपण त्याला एक महिना व जास्तीचे दहा दिवस दिले. येत्या २४ तारखेला त्यास ४० दिवस पूर्ण होत आहेत. आरक्षणाचा घास हातातोंडाशी आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एका ही मराठ्याच्या पोराने आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर पोरे मरायला लागली तर आरक्षण द्यायचे कुणाला अन् आंदोलन करुन त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला.

आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक ही डाव आत्तापर्यंत आपण यशस्वी होऊ दिला नाही. पुढेही होऊ द्यायचा नाही म्हणून आता त्यांचे नाव घ्यायचे नाही, असे ते म्हणाले. आता त्यांनी बहुतेक आपलेच लोक आपल्या विरोधात उठवायचे ठरवले आहे. तो ही त्यांचा डाव आपण हाणून पाडायचा आहे. त्यासाठी २४ तारखेपर्यंत शांत रहायचे आहे. कोणाच्या टीकेला उत्तर द्यायचे नाही. कोणाचे नाव घ्यायचे नाही. २४ तारखेनंतर मात्र त्यांची गाठ मराठ्यांशी आहे. मग बघू कोण कोण येते ते अशा शब्दात त्यांनी आरक्षणविरोधकांना आव्हान दिले. प्रास्ताविक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण पवार यांनी केले.

महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजावरच हल्ला -

अंतरवाली सराटी या ठिकाणच्या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांवर हल्ला झाल्यानंतर जरांगे पाटील अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द झाले. त्या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा अजूनही ओल्या असल्याचे त्यांच्या भाषणात प्रकर्षाने जाणवले. त्यांनी आपल्या भाषणात त्यावेळेसचा प्रसंग संथ व ठाशीव पध्दतीने सांगितला. ते म्हणाले की, हा हल्ला केवळ अंतरवालीवर नव्हता, तो महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजावरचा हल्ला होता. आम्हाला तर रक्तबंबाळ केले. आमच्या आयाबहिणींचे डोके फोडले. चार महिन्याचे लेकरु मांडीवर असणा-या भगिनीच्या डोक्यात काठ्या मारल्या. बत्तीस टाके पडले. रक्त त्या लेकराच्या अंगावर पडत होते. त्या किंकाळ्या ऐकण्यासारख्या नव्हत्या. आम्ही काही पाप केले नव्हते. लोकशाहीच्या व कायद्याने केलेल्या नियमाच्या आधीन राहून ते आंदोलन सुरु होते. आमरण उपोषणासारखे इतक्या  शांततेत असणारे आंदोलन देशात झालेले नाही,तरी ही सरकारने तो हल्ला घडवून आणला. मात्र आम्ही डगमगलो नाही. आज ही शांततेत ते आंदोलन सुरु आहे. आता तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसतच नाही. कारण आमच्या संयमाचा विचार सरकारला करावा लागेल. आम्ही हटणारातले मराठे नाही. मराठ्यांनी अफगाणिस्तानापर्यंत झेंडे लावले आहेत. तुमचा तर उलटासुलटाच कार्यक्रम करतील, असे सांगून  आता तरी शुध्दीवर या, असा सल्ला जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndapurइंदापूर