शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

'आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:56 IST

येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे सध्या विरोधकांपेक्षा आपल्यातील काही नाराजांचीच भीती आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केले

पुणे: केंद्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार सध्या सुडबुद्धीने वागत आहे, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. केंद्राने कितीही त्रास देऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच आणि जे त्रास देत आहेत, त्यांना आम्ही पुरून उरणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिली वळसे पाटील (Dilip Walase patil) यांनी सांगितले. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली झेपी गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. 

मागील काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकार बऱ्याच मुद्द्यावर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सध्या राज्यात गाजत असलेले आर्यन खान आणि समीर वानखेडेप्रकरणीही राज्यात मोठा गोंधळ दिसत आहे. 'सध्या राज्यात मराठा, धनगर आणि अल्पसंख्याक समाजांची आरक्षणाची मागणी वाढत आहे. या समाजांच्या मागणीला राज्य सरकारमधील प्रत्येक पक्षाचा पाठींबा आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजप मुद्दामपणे राज्य सरकारला या मुद्द्यांवरून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही दिलीप वळसे-पाटलांनी यावेळी बोलताना केला.

येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे सध्या विरोधकांपेक्षा आपल्यातील काही नाराजांचीच भीती आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला मतदान झालं तसंच मतदान आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालं पाहिजे. निर्वाचित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील जनतेसाठी लोकोपयोगी कामं केली पाहिजेत, अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडे