शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सुरक्षिततेसाठी डिजिटलायजेशन

By admin | Updated: August 2, 2016 01:44 IST

महाविद्यालय परिसरातील टवाळखोरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना चिंता असते.

पिंपरी : महाविद्यालय परिसरातील टवाळखोरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना चिंता असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवडमधील प्रतिभा शिक्षण संस्थेने डिजिटलायजेशनचा वापर केला आहे. त्यातून पाल्याची उपस्थिती, गैरहजेरी, तो आता कोठे आहे, ही माहिती पालकांना मिळणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालय परिसरात होणाऱ्या टवाळखोरीलाही आळा बसणार आहे.एकविसावे शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. देशाचे भवितव्य हे तरुणांच्या हाती आहे. त्यामुळे ‘स्मार्ट नागरिक’ घडविण्यासाठी प्रयत्न विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड कॉम्प्युटर स्टडीज् महाविद्यालय आहे. तिथे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना टेक्नोसेव्ही बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सचिव डॉ. दीपक शहा यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. दहावीनंतर मुले कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्या वेळी आपला पाल्य महाविद्यालयात जातो किंवा नाही, याबाबतची खातरजमा करण्याची यापूर्वी कोणतीही पद्धत नव्हती. त्यामुळे मुलांची चिंता पालकांना सतावत असायची. मात्र, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामुळे पाल्याची चिंता करण्याचे आता कोणतेही कारण नाही. कारण, प्रतिभा संस्थेने या विषयी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. मुलगा महाविद्यालयात कधी आला, त्याची महाविद्यालय प्रवेशाची वेळ काय, तो किती तासिकांना उपस्थित राहिला, तो किती वाजता बाहेर पडला, याची माहितीही एसएमएसद्वारे कळविली जाते. (प्रतिनिधी)टवाळखोरांवर नियंत्रणमहाविद्यालयाच्या आवारात अन्य विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे टवाळखोरांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. तसेच काही टवाळखोर थेट आपल्या मित्राबरोबर वर्गात बसत असत. त्यामुळे महाविद्यालयांच्या आवारात छेडछाडीच्या घटना घडत असत. मात्र, डिजिटलायजेशनने टवाळखोरीवर नियंत्रण आणण्याचे काम केले आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून टवाळखोरीवर नियंत्रण आणता येणार आहे, असे डॉ. कांकरिया यांनी सांगितले. >माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही पाल्याच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला बारकोडचे ओळखपत्र दिले आहे. हे ओळखपत्र स्कॅन करूनच विद्यार्थ्यांना आवारात प्रवेश दिला जातो. त्यानंतर प्रत्येक तासिकेलाही आयकार्ड स्कॅन करून हजेरी घेण्यात येते. त्यामुळे मुलाचा शाळा प्रवेश, तो किती तासिकांना होता किंवा नाही, त्याच्या हजेरीविषयीची माहिती पालकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले आहे. हा उपक्रम एक जुलैपासून सुरू केला आहे. - डॉ. राजेंद्र कांकरिया (प्राचार्य)