शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुरक्षिततेसाठी डिजिटलायजेशन

By admin | Updated: August 2, 2016 01:44 IST

महाविद्यालय परिसरातील टवाळखोरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना चिंता असते.

पिंपरी : महाविद्यालय परिसरातील टवाळखोरीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांना चिंता असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवडमधील प्रतिभा शिक्षण संस्थेने डिजिटलायजेशनचा वापर केला आहे. त्यातून पाल्याची उपस्थिती, गैरहजेरी, तो आता कोठे आहे, ही माहिती पालकांना मिळणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालय परिसरात होणाऱ्या टवाळखोरीलाही आळा बसणार आहे.एकविसावे शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. देशाचे भवितव्य हे तरुणांच्या हाती आहे. त्यामुळे ‘स्मार्ट नागरिक’ घडविण्यासाठी प्रयत्न विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड कॉम्प्युटर स्टडीज् महाविद्यालय आहे. तिथे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना टेक्नोसेव्ही बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सचिव डॉ. दीपक शहा यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. दहावीनंतर मुले कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्या वेळी आपला पाल्य महाविद्यालयात जातो किंवा नाही, याबाबतची खातरजमा करण्याची यापूर्वी कोणतीही पद्धत नव्हती. त्यामुळे मुलांची चिंता पालकांना सतावत असायची. मात्र, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामुळे पाल्याची चिंता करण्याचे आता कोणतेही कारण नाही. कारण, प्रतिभा संस्थेने या विषयी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. मुलगा महाविद्यालयात कधी आला, त्याची महाविद्यालय प्रवेशाची वेळ काय, तो किती तासिकांना उपस्थित राहिला, तो किती वाजता बाहेर पडला, याची माहितीही एसएमएसद्वारे कळविली जाते. (प्रतिनिधी)टवाळखोरांवर नियंत्रणमहाविद्यालयाच्या आवारात अन्य विद्यार्थ्यांचा वावर असतो. त्यामुळे टवाळखोरांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. तसेच काही टवाळखोर थेट आपल्या मित्राबरोबर वर्गात बसत असत. त्यामुळे महाविद्यालयांच्या आवारात छेडछाडीच्या घटना घडत असत. मात्र, डिजिटलायजेशनने टवाळखोरीवर नियंत्रण आणण्याचे काम केले आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून टवाळखोरीवर नियंत्रण आणता येणार आहे, असे डॉ. कांकरिया यांनी सांगितले. >माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही पाल्याच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला बारकोडचे ओळखपत्र दिले आहे. हे ओळखपत्र स्कॅन करूनच विद्यार्थ्यांना आवारात प्रवेश दिला जातो. त्यानंतर प्रत्येक तासिकेलाही आयकार्ड स्कॅन करून हजेरी घेण्यात येते. त्यामुळे मुलाचा शाळा प्रवेश, तो किती तासिकांना होता किंवा नाही, त्याच्या हजेरीविषयीची माहिती पालकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले आहे. हा उपक्रम एक जुलैपासून सुरू केला आहे. - डॉ. राजेंद्र कांकरिया (प्राचार्य)