शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर पुस्तक लिहावे - अजित पवार

By राजू इनामदार | Updated: April 25, 2025 16:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ हे एक पुस्तक लिहिले आता ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर लिहा असे मी सुचवतो

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या भाषणांचे संकलन असलेल्या 'ऐकलंत का?' या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवारांनीदेवेंद्र फडणवीस यांना दुसरे पुस्तक लिहिण्याचे सुचवले आहे. चांदेरे यांच्या पुस्तकातून राज्याचा सामाजिक, सांस्कृतिक आलेखच मांडला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ हे एक पुस्तक लिहिले आहे. आता त्यांना चांदेरेंचे पुस्तक देतो व दुसरे पुस्तक ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर लिहा असे सुचवतो असे पवार यांनी म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला.

यावेळी  क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, आमदार शंकर मांडेकर, बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, लेखक चांदेरे, दिलीप मोहिते-पाटील, रमेश ढमाले, अशोक पवार, सुरेश घुले, विजय कोलते, चंद्रकांत मोकाटे, स्वप्नील ढमढेरे व अन्य राजकीय, सामाजिक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाला सुसंस्कृतपणाचा वारसा दिला. आजच्या राजकारणात तो दिसत नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. राजकारण हे सेवा करण्याचे, समाज परिवर्तनाचे साधन आहे हे मान्य असणारे फार कमी लोक आता राजकारणात राहिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक देखील होते. भाषेवरचे प्रभुत्व आणि विचारांची मांडणी याव्दारे त्यांनी समस्त महाराष्ट्राला खिळवून ठेवले होते. वाचनाचा पाया पक्का असल्यास आपली विचारांवरची निष्ठा कायम राहून आपल्या भूमिकेवर ठाम राहता येते. ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व चांगले असले म्हणजे भाषण चांगले होते, असे नाही, तर ज्या व्यक्तीविषयी आपण बोलतो त्या व्यक्तीविषयी मनात कणव, तळमळ, प्रेम असेल, तरच ते भाषण आणि मनाचा ठाव घेणारे होते.”

रामदास फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. दुर्गाडे यांनी प्रास्तविक केले. लेखक सुनील चांदेरे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे आणि चित्रा खरे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस