शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी; शहरासाठी 'या' चार रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू - अश्विनी वैष्णव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:43 IST

पुणे हे समृद्ध शहर व परिसर असून शैक्षणिक हब बनले आहे, त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी नेहमी येते

पुणे: शहर आणि परिसराचा वेगाने विकास होत असल्यामुळे येथून लांब पल्ल्याच्या गाड्या वाढविण्याची मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे पुण्यातील चार रेल्वे स्टेशन विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये उरळी येथे सर्वांत मोठे टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी संसदेत बुधवारी दिली.

अधिवेशनात अनेक खासदारांनी पुण्यातून रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली होती. यावर बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे शहर व परिसर हा एक समृद्ध आहे. पुणे हे शैक्षणिक हब बनले आहे. त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी नेहमी येते. त्यामध्ये जबलपूर, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून पुण्यासाठी रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली आहे. पुण्यातून रेल्वे गाड्या वाढविण्यासाठी तेथील रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये चार रेल्वे स्टेशनचा विकास केला जात आहे.

पुणे रेल्वे स्टेशनचे रिमॉडलिंगचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याबरोबरच हडपसर टर्मिनल, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. उरुळी येथे मोठे टर्मिनल विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवासी उतरून ती गाडी पुढे उरुळीला जाईल. त्या ठिकाणीच गाडीची देखभाल दुरुस्ती होईल. ती गाडी पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनमार्गे प्रवास करील. या स्टेशनच्या विकासामुळे गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. त्याचा फायदा प्रवाशांना निश्चित होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वेEducationशिक्षणpassengerप्रवासीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार