शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पवना धरणात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:35 IST

हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते.

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून आज एका संगणक अभियंत्याचा दुदैवी मृत्यु झाला. मागील दहा दिवसांत या धरणात तीन युवकांचा बुडून मृत्यु झाला आहे.अतुल अनिलकुमार गगन (वय २३ , रा. पटना, सध्या रा. इन्फोसिस, हिंजवडी) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता पाण्यात बुडून अतुलचा मृत्यु झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रची रेस्कू टिम घटनास्थळी दाखल झाली.  शिवदुर्गचे महेश मसणे, सागर कुंभार, राहुल देशमुख, मोरेश्वर मांडेकर, स्वप्निल भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, गणेश गायकवाड, योगेश उंबरे,राजेंद्र कडु, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ९ एप्रिल रोजी देखिल याच धरणात बुडून पुण्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला.    पवना धरणाचा परिसर हा अथांग पसरलेला आहे. धरणाच्या पाण्यात कोणी उतरु नये याकरिता काही भागात सुरक्षा तार लावण्यात आली आहे तर काही भागात सहजपणे पाण्यात उतरा येत असल्याने पर्यटनाकरिता या भागात येणारे पर्यटन पाण्यात पोहण्याकरिता उतरतात मात्र या भागात पाटबंधारे विभाग अथवा ग्रामीण पोलीसांकडून गस्त घातली जात नसल्याने प्राणांतिक घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी गस्तीचे योग्य नियोजन केल्यास या धरणातील अपघातांच्या घटना ठळू शकतील अशी अपेक्षा या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच पर्यटकांनी देखिल जीव धोक्यात घालून पाण्यात उतरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPavna Nagarपवना नगरDamधरणDeathमृत्यू