शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरणात बुडून संगणक अभियंत्याचा मृत्यु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:35 IST

हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते.

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून आज एका संगणक अभियंत्याचा दुदैवी मृत्यु झाला. मागील दहा दिवसांत या धरणात तीन युवकांचा बुडून मृत्यु झाला आहे.अतुल अनिलकुमार गगन (वय २३ , रा. पटना, सध्या रा. इन्फोसिस, हिंजवडी) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण आज दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता पाण्यात बुडून अतुलचा मृत्यु झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रची रेस्कू टिम घटनास्थळी दाखल झाली.  शिवदुर्गचे महेश मसणे, सागर कुंभार, राहुल देशमुख, मोरेश्वर मांडेकर, स्वप्निल भांगरे, विकास मावकर, दुर्वेश साठे, गणेश गायकवाड, योगेश उंबरे,राजेंद्र कडु, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ९ एप्रिल रोजी देखिल याच धरणात बुडून पुण्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला.    पवना धरणाचा परिसर हा अथांग पसरलेला आहे. धरणाच्या पाण्यात कोणी उतरु नये याकरिता काही भागात सुरक्षा तार लावण्यात आली आहे तर काही भागात सहजपणे पाण्यात उतरा येत असल्याने पर्यटनाकरिता या भागात येणारे पर्यटन पाण्यात पोहण्याकरिता उतरतात मात्र या भागात पाटबंधारे विभाग अथवा ग्रामीण पोलीसांकडून गस्त घातली जात नसल्याने प्राणांतिक घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी गस्तीचे योग्य नियोजन केल्यास या धरणातील अपघातांच्या घटना ठळू शकतील अशी अपेक्षा या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच पर्यटकांनी देखिल जीव धोक्यात घालून पाण्यात उतरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPavna Nagarपवना नगरDamधरणDeathमृत्यू