शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पुणे विभागात १ लाख ३६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:27 IST

येत्या पाच दिवसांत पिकांचे पंचनामे करण्याची व प्राप्त अहवालानुसार शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांची माहिती : पंचनाम्याचे काम वेगाने सुरूअवकाळी पावसामुळे पुणे विभागातील विविध ठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पुणे विभागात आजअखेर सरासरी १३७.२४ टक्के इतका पाऊस

पुणे : अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे १ लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात सोयाबीन, भात, ज्वारी, द्र्राक्षबागा आदींचा समावेश आहे. येत्या पाच दिवसांत पिकांचे पंचनामे करण्याची व प्राप्त अहवालानुसार शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी दिली़.अवकाळी पावसामुळे पुणे विभागातील विविध ठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, स्वत: विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दोन दिवस सोलापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा केला आहे. तसेच, नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. तसेच, विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसानाबाबत माहिती रविवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. याप्रसंगी म्हैसेकर म्हणाले, की विभागामधील सांगलीत ६५ हजार २६७ हेक्टर, सोलापुरात ३६ हजार ३४५ हेक्टर, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८१ हेक्टर, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८०० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातही प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, द्र्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला विमा कंपनी किंवा शासनाकडून मदत केली जाणार आहे. याकरिता सर्व विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे, असेही म्हैसेकर यांनी नमूद केले.......पावसामुळे ५१ तालुके बाधितअवकाळी पावसामुळे पुणे विभागातील ५१ तालुके बाधित असून, विभागातील १ लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे नमूद करून म्हैसेकर म्हणाले, विभागातील सर्वच भागांतील पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुन्हा पाऊस आला नाही तर येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. पंचनाम्यासाठी जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहेत. ज्या पिकाचा विमा काढण्यात आलेला आहे, त्याबाबतची वेगळी माहिती घेऊन संबंधित शेतकºयांचे पंचनामे करून घेतले जात आहेत...........विभागातील पाऊस पुणे विभागात आजअखेर सरासरी १३७.२४ टक्के इतका पाऊस झाला असून, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक १८२.५ टक्के पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात १५८.५ टक्के, सातारा जिल्ह्यात १७०.८६ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ९१.७५ टक्के, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२०.२४ टक्के इतका पाऊस झाला असल्याचेही डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरी