शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सध्याची राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी : राधाकृष्ण विखे-पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:00 IST

... त्यामुळे मी सुध्दा निरीक्षकाची भूमिका घेतली.

ठळक मुद्देपाचव्या युवा संसदेचे उद्घाटन

पुणे : सध्याची राजकीय स्थित्यंतरे तरुण पिढी पहात असून राज्यातील राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी आहे. कधीही एकत्र न येणारे आता एकत्र आले आहेत. त्यामुळे मी सुध्दा निरीक्षकाची भूमिका घेतली आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, कॉमनवेल्थ युथ कौंन्सिल, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित पाचव्या युवा संसदेच्या उद्घाटन प्रसंगी विखे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर, डॉ.श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, युवा क्षेत्रात रमणप्रीत यांना आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार, युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दरम्यान, युवा संसदेस महाराष्ट्रातील विविध भागातून 2 हजाराहून अधिक युवक आले होते.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, चांगले युवा निर्माण होण्याकरीता महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्या. महाविद्यालयीन निवडणुकांवर बंदी घालणे चुकीचे आहे. आम्ही अशाच निवडणुकांमधून तयार होत पुढे आलो.युवक उद्याचे भविष्य आहेत, हे वाक्य केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता. त्यांना चांगल्या संधी मिळायला हव्यात. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, राजकारणात येण्याकरीता नेतृत्वगुणांची साधना करणे आवश्यक आहे. सरकार चालविणे, नेता बनणे हे सोपे नाही. त्याकरीता प्रशिक्षण व अनुभव असणे गरजेचे आहे. युवकांनी राजकारणात येत आपल्यामधील गुणसंपदा वाढवायला हवी. ---------------------------------- देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहाटे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच राज्यपालांनी पहाटे ५ वाजता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटविली.त्यानंतर सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावर आले.तर काही दिवसांनी भाजप विरहित तीन पक्षांचे सरकार आले, ही अघटीत घटना होती. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत ? असे कधी घडले नव्हते. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीचा अभ्यास सुध्दा विद्यार्थ्यांनी करायला हवा,असे आवाहन खासदार गजानन किर्तीकर यांनी केले................

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसStudentविद्यार्थी