शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

coronavirus : इतर देशांच्या तुलनेत भारतात काेराेनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 21:53 IST

काेराेनाची लागण हाे्ण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.

पुणे : भारतात ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी घेण्याचे प्रमाण कमी असल्याने जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी असल्याचे मत देशातील तसेच देशाबाहेरील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी, देशातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला सुमारे ८ आठवडे उलटली आहेत. तरीही अद्याप ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी न केलेल्या मात्र, या आजाराची लक्षणे आढळल्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रासह देशात खूपच मर्यादित आहे. 

भारतात ३१ जानेवारीला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्या घटनेला बुधवारी (दि. २५) ५४ दिवस म्हणजेच सुमारे ८ आठवडे लोटले आहेत. या काळात भारतात सुमारे २२ हजार ९२८ चाचण्या झाल्या. यात आतापर्यंत ६१२ जण पॉझिटिव्ह (४० जण बरे झाले, १० जणांचा मृत्यू, ५६२ जणांवर अद्याप उपचार सुरू) आढळले. इटलीत या ५४ दिवसांच्या काळात बाधितांची संख्या २ वरून ६९ हजार १७६ इतकी प्रचंड वाढली आहे. यादरम्यान तेथे २ लाख ९६ हजार ९६४ चाचण्या घेण्यात आल्या. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये बाधितांची संख्या अनुक्रमे ५५ हजार २३८ आणि ८ हजार १६७ इतकी आहे.

कोरोनाची लागण झाली अथवा नाही, याची तपासणी करणाºया चाचण्या आपल्याकडेअतिशय कमी प्रमाणात झाल्या हे खरे आहे. मात्र, अशी चाचणी न केलेल्या पण 'कोविड-१९' या आजाराची लक्षणे आढळली म्हणून डॉक्टरांकडे धाव घेणारे रुग्ण आळल्याची नोंद अपवाद वगळता दिसत नाही. ही जीवघेणी साथ आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक  डाऊन जाहीर केला आहे. यामुळे माहिती उपलब्ध होण्यावर मर्यादा आली असली तरी सोशल मीडिया या लॉक डाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. ‘कोविड-१९’ची चाचणी न झालेले पण या आजाराची लक्षणे आढळणारे रुग्ण देशात लक्षणीय प्रमाणात आढळले असते तर सोशल मीडियावर याचे पडसाद नक्कीच उमटले असते. शिवाय, आरोग्य खात्याकडेदेखील तशी नोंद झाली असती. मात्र, या दोन्ही पातळीवर अद्यापपर्यंत तरी चिंता वाढावी, असा प्रतिसाद आलेला नाही. याचा अर्थ, या रोगाचा शिरकाव झाल्याच्या ८ आठवड्यानंतर म्हणजे, आतापर्यंत तरी 'कम्युनिटी इन्फेक्शन' अर्थात सामाजिक लागण होण्याचा टप्पा नियंत्रणात ठेवण्यामध्ये शासन, प्रशासन आणि जनता यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

... तरीही चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवेइतर देशांमध्ये हा विषाणू ज्या वेगाने पसरला आहे, तितके जास्त प्रमाण आपल्या देशात कदाचित नसेलही. पण, सामुहिक लागण होण्याच्या टप्प्यात आपण सध्या आहोत. या टप्प्यात ‘कोविड-१९’ची लागण नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण आपण वाढवायला हवे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी शिफारस पुरेशी ठरविण्यात यावी. सध्या असे होत नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांच्या अंंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचविल्यास संबंधित संशयिताची चाचणी घेणे सुरू करायला हवे. असे झाल्यास आपण हा आजार पसरण्याला अधिक जास्त प्रमाणात प्रतिबंध करू शकू.- डॉ. अनंत फडके, सहसमन्वयक,  जनआरोग्य अभियान 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत