शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : इतर देशांच्या तुलनेत भारतात काेराेनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 21:53 IST

काेराेनाची लागण हाे्ण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.

पुणे : भारतात ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी घेण्याचे प्रमाण कमी असल्याने जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी असल्याचे मत देशातील तसेच देशाबाहेरील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी, देशातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला सुमारे ८ आठवडे उलटली आहेत. तरीही अद्याप ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी न केलेल्या मात्र, या आजाराची लक्षणे आढळल्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रासह देशात खूपच मर्यादित आहे. 

भारतात ३१ जानेवारीला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्या घटनेला बुधवारी (दि. २५) ५४ दिवस म्हणजेच सुमारे ८ आठवडे लोटले आहेत. या काळात भारतात सुमारे २२ हजार ९२८ चाचण्या झाल्या. यात आतापर्यंत ६१२ जण पॉझिटिव्ह (४० जण बरे झाले, १० जणांचा मृत्यू, ५६२ जणांवर अद्याप उपचार सुरू) आढळले. इटलीत या ५४ दिवसांच्या काळात बाधितांची संख्या २ वरून ६९ हजार १७६ इतकी प्रचंड वाढली आहे. यादरम्यान तेथे २ लाख ९६ हजार ९६४ चाचण्या घेण्यात आल्या. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये बाधितांची संख्या अनुक्रमे ५५ हजार २३८ आणि ८ हजार १६७ इतकी आहे.

कोरोनाची लागण झाली अथवा नाही, याची तपासणी करणाºया चाचण्या आपल्याकडेअतिशय कमी प्रमाणात झाल्या हे खरे आहे. मात्र, अशी चाचणी न केलेल्या पण 'कोविड-१९' या आजाराची लक्षणे आढळली म्हणून डॉक्टरांकडे धाव घेणारे रुग्ण आळल्याची नोंद अपवाद वगळता दिसत नाही. ही जीवघेणी साथ आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक  डाऊन जाहीर केला आहे. यामुळे माहिती उपलब्ध होण्यावर मर्यादा आली असली तरी सोशल मीडिया या लॉक डाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. ‘कोविड-१९’ची चाचणी न झालेले पण या आजाराची लक्षणे आढळणारे रुग्ण देशात लक्षणीय प्रमाणात आढळले असते तर सोशल मीडियावर याचे पडसाद नक्कीच उमटले असते. शिवाय, आरोग्य खात्याकडेदेखील तशी नोंद झाली असती. मात्र, या दोन्ही पातळीवर अद्यापपर्यंत तरी चिंता वाढावी, असा प्रतिसाद आलेला नाही. याचा अर्थ, या रोगाचा शिरकाव झाल्याच्या ८ आठवड्यानंतर म्हणजे, आतापर्यंत तरी 'कम्युनिटी इन्फेक्शन' अर्थात सामाजिक लागण होण्याचा टप्पा नियंत्रणात ठेवण्यामध्ये शासन, प्रशासन आणि जनता यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

... तरीही चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवेइतर देशांमध्ये हा विषाणू ज्या वेगाने पसरला आहे, तितके जास्त प्रमाण आपल्या देशात कदाचित नसेलही. पण, सामुहिक लागण होण्याच्या टप्प्यात आपण सध्या आहोत. या टप्प्यात ‘कोविड-१९’ची लागण नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण आपण वाढवायला हवे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी शिफारस पुरेशी ठरविण्यात यावी. सध्या असे होत नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांच्या अंंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचविल्यास संबंधित संशयिताची चाचणी घेणे सुरू करायला हवे. असे झाल्यास आपण हा आजार पसरण्याला अधिक जास्त प्रमाणात प्रतिबंध करू शकू.- डॉ. अनंत फडके, सहसमन्वयक,  जनआरोग्य अभियान 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत