शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Corona virus : मार्केटयार्ड पुढील आदेश येईपर्यंत राहणार 'लॉक'च; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 19:35 IST

प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे भाजीपाला फळे, कांदा व बटाटा व्यापार राहणार नसल्याचे स्पष्ट

ठळक मुद्देपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रविवारपासून सर्व जीवनावश्यक दुकाने दिवसभर सुरू राहणार

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रविवार (दि.१९) पासून सर्व जीवनावश्यक दुकाने दिवसभर सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्षष्ट केले आहे. परंतु शहरातील मुख्य बाजार आवार आणि उपबाजार सुरू करण्यासाठी भाजीपाला व कांदा - बटाट्याचा व्यापार करण्याची वेळ ही सकाळी ८ते १२ च्या ऐवजी रात्री ९ ते दुपारी १२ अशी वेळ द्यावी की ज्यामुळे मार्केटयार्ड मधील फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील व्यापार सुलभ होईल, अशी मागणी बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आली होती. परंतु याबाबत जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ वाढून देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही.प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाल्याने रविवारी भाजीपाला व फळे, कांदा व बटाटा व्यापार सुरू राहणार नसल्याचे आडते असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे, भाजीपाला, व कांदा- बटाट्याचा व्यापार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १३ जुलै ते १८ जुलैपर्यंत पुणे शहरामध्ये संपूर्ण लॉकडाऊन केलेल्याने बंद आहे. त्यानंतर १९ जुलैपासून प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला होता व यासाठी दिनांक १९ जुलैपासून सकाळी ८ ते १२ या वेळेमध्ये भाजीपाला व आडत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शासनाच्या सदर आदेशामध्ये पुणे मार्केटयार्ड मुख्य बाजार आवार व त्याचप्रमाणे उपबाजार याचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता.यामुळे शुक्रवार ( दि.१७ ) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी.जे. देशमुख यांच्याशी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ व पुणे मर्चंट चेंबर चे अध्यक्ष पोपट ओसवाल संपर्क साधला होता. त्यानुसार बी.जे. देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र लिहून फळे, भाजीपाला व कांदा - बटाट्याचा व्यापार करणेची वेळ ही सकाळी ८ ते १२ च्या ऐवजी रात्री ९ ते दुपारी १२ अशी वेळ द्यावी की ज्यामुळे मार्केटयार्ड मधील फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील व्यापार सुलभ होईल.परंतु, शनिवारी सायंकाळ पर्यंत जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्याकडून याबाबत कोणतेही उत्तर अथवा स्षष्ट आदेश आले नाही. यामुळे प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत फळे भाजीपाला व कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे विलास भुजबळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डvegetableभाज्याfruitsफळेcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त