शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पीएमपीच्या 'आदरांजली' योजनेवरही कोरोनाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 11:34 IST

लॉकडाऊन काळात ही कपात न झाल्याने या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी ही मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण

पुणे : सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या आदरांजली योजनेवरही कोरोनाचे सावट आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनच प्रत्येकी ५० रुपये घेतले जातात. पण लॉकडाऊन काळात ही कपात न झाल्याने या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी ही मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वारसदारांसाठी आदरांजली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत स्वेच्छेने सुमारे ८ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या वेतनातून योजनेसाठी ५० रुपये कपात करणे अपेक्षित होते. ही रक्कम निधन झालेले कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसदारांना दिली जाणार आहे. पण लॉकडाऊनमुळे पीएमपीची बससेवा ठप्प होती. अनेक कर्मचाºयांना वेतनही मिळाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कपात करण्यात आली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या वेतनापासून ही कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक कामगार अधिकारी सतिश गाटे यांनी काढले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात चार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून २०० रुपये कपात केली जाणार आहे.

फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीतही काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. या कर्मचाऱ्यांना आदरांजली योजनेचा लाभ मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळाले नाही, अनेकांना कामही नव्हते. त्यामुळे ५० रुपये कपात करता आले नाहीत. त्यामुळे या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत संभ्रम आहे. गाटे यांनीही याला दुजोरा दिला. लॉकडाऊन काळात काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. त्यांनाही योजनेचा लाभ द्यायचा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मोठी रक्कम कपात करावी लागेल. त्यामुळे याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे गाटे यांनी सांगितले.----------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूEmployeeकर्मचारी