शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

२८ किल्ल्यांचे संवर्धन अन‌् ९० कोटींची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

(भाग -४) पुणे : राज्याच्या दुर्गसंवर्धन समितीने पाच वर्षांच्या कालावधीत चांगले काम केले आहे. २८ किल्ल्यांवर संवर्धनाचे ९० टक्के ...

(भाग -४)

पुणे : राज्याच्या दुर्गसंवर्धन समितीने पाच वर्षांच्या कालावधीत चांगले काम केले आहे. २८ किल्ल्यांवर संवर्धनाचे ९० टक्के काम झाले. तसेच राज्यातील ८३ गड, किल्ले राज्य संरक्षित स्मारक करावे, यासाठी शासनाबरोबर समितीने पाठपुरावा केला आहे. मात्र, तरीही समिती का बरखास्त केली, असा सवाल दुर्गसंवर्धन समितीतील डॉ. सचिन जोशी, राजेंद्र टिपरे आणि इतर सदस्यांनी केला आहे.

राज्य शासनाने सुरुवातीला १४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे कोणत्या किल्ल्यांवर तो खर्च करायचा याची यादी समितीने केली. समितीच्या डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथील एकूण २८ किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू झाली. पुरातत्व विभागाने यातील अंदाजे ९० कोटी रुपयांचा निधी खर्च करून माणिकगड, माहूरगड (विदर्भ), कोरीगड (पुणे), विशाळगड (कोल्हापूर), बाणकोट, पूर्णगड (रत्नागिरी) या किल्ल्यांवर संवर्धनाचे काम झाले आहे. ही सर्व कामे दुर्ग संवर्धन समितीच्या २०१५ ते २०१९ या कालावधीत झाली, असे डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाचे संशोधक डॉ. सचिन जोशी यांनी सांगितले.

------------

समितीचे काम चांगले सुरु होते. २८ किल्ल्यांवरील ९० टक्के पूर्ण झाले आहे. समितीचे काम थांबवणे चुकीचे होते. त्यामुळे दोन वर्षे झाली गड, किल्ले संवर्धनाच्या कामात खंड पडला आहे. आता नव्याने २५० लोकांबरोबर शासन काम करणार आहे. मात्र, यातील बहुतेक लोक हे इतर क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे गड, किल्ल्यांशी निगडित काम कसे होणार असा प्रश्न पडतो. ऐतिहासिक वास्तू, स्मारकाबाबत गांभीर्याने विचार, काम होणे अपेक्षित आहे.

- राजेंद्र टिपरे, सदस्य, दुर्गसंवर्धन समिती

------------

बाणकोट किल्ल्याची अवस्था खूपच वाईट होती. तट बुरूजांवर झाडे वाढली होती. पडझड झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने किल्ला स्वच्छ केला होता. गडावर ध्वजासाठी पोलही लावला. उपसंचालक भा. वि. कुलकर्णी यांना कोकणातील हा किल्ला संवर्धनासाठी घेण्यासाठी सुचवले.

- चंद्रशेखर शेळके, सदस्य, दुर्ग संवर्धन समिती

-------------

समितीने केलेली कामे

गड, किल्ल्यांचे डॉक्युमेंटेशन, मॅपिंग करण्यासाठी सातत्याने दोन वर्षे पाठपुरावा केला. गडसंवर्धनासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथे कार्यशाळा घेतल्या. गड, किल्ल्यांच्या नकाशांचे काम सुरू केले. गडसंवर्धन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे यासाठी कायमच पुरातत्त्व विभागाकडे आग्रह धरला. दुर्गसंवर्धन करणाऱ्या विविध खासगी संस्थानी कशा प्रकारे काम करावे याचे मार्गदर्शन केले. तसेच गड, किल्ले स्वच्छता अभियान पूर्ण एक महिना विविध किल्ल्यांवर राबविले.

------------------------

फोटो : पुणे जिल्ह्यातील कोरीगड किल्ल्यावर संवर्धनाचे ९० टक्के काम झाले आहे.