शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

By राजू इनामदार | Updated: April 12, 2025 08:59 IST

प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार : वाढत्या विद्वेषाला प्रेमभावना हेच उत्तर

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराच्या दंगलग्रस्त भागात काँग्रेस सद्भावना यात्रा काढणार आहे. समाजात जातीय धार्मिक विद्वेष वाढत असून त्याला उत्तर म्हणूनच ही सद्भावना यात्रा असणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. १६ एप्रिलला निघणाऱ्या या यात्रेत पक्षाचे सर्व राज्यस्तरीय तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सपकाळ शुक्रवारी दुसऱ्या वेळी पुणे दौऱ्यावर आले होते. महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांनी सकाळी समताभूमीला भेट दिली व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. दुपारी पुण्यातील एका खासगी भेटीत ‘लोकमत’बरोबर बोलताना सपकाळ यांनी सद्भावना यात्रेची माहिती दिली. याआधी त्यांनी बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग ते बीड अशी दोन दिवसांची सद्भावना यात्रा काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेक गावांमधून लोक स्वयंस्फूर्तीने या यात्रेत सहभागी झाले होते.त्यावरून बोलताना सपकाळ यांनी सांगितले की, समाजातील जातीय तसेच धार्मिक विद्वेष वाढतच चालला आहे. त्याला खतपाणी मिळण्यासारखी स्थिती आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वांना बरोबर घेत चालण्याची भूमिका घेतली आहे. समाज एकसंध असावा, तिथे जातीय तसेच धार्मिक द्वेषाला, तिरस्काराला काहीही महत्त्व असू नये हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच समाजातील या वाढत्या विद्वेषाला प्रेमभावनेचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे. ती लक्षात घेऊनच नागपुरात दंगलग्रस्त भागात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेसचे सगळे नेते, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सहभागी होतील. नागपूर शहर कधीही दंगलींसाठी प्रसिद्ध नव्हते. किंबहुना राज्यातील काही ठिकाणी अशांतता, अस्वस्थता असली तरीही नागपुरातील शांततेचा कधी भंग झाला नाही. अशा शहरामध्ये दंगल व्हावी, त्याचे निमित्त कोणाची तरी कबर ठरावे हे सगळे चिंता करण्यासारखे आहे, असे सपकाळ म्हणाले. कोणीतरी यात पुढाकार घ्यायलाच हवा, त्यासाठी काँग्रेसच योग्य आहे असे वाटले म्हणूनच या सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.

हा पक्षाचा उपक्रम आहे, मात्र त्यात फक्त राजकारणच आहे असे नाही. त्यामुळे कोणीही स्थानिक संस्था, संघटना यात सहभागी होऊ शकतात. दंगलग्रस्तांना दिलासा देणे, तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे त्यांना सांगणे हा मुख्य उद्देश आहे. कोणाला राजकीय प्रत्युत्तर वगैरे देण्यासाठी ही यात्रा आहे असे समजणे योग्य नाही.- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपाnagpurनागपूर