शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राष्ट्रवादीने आमदार संग्राम थोपटेंना दिला धक्का; भोलावडे ग्रामपंचायतीत सत्तांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:44 IST

सरपंच निवडीत प्रवीण जगदाळे १४१ मतांनी विजयी...

भोर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोलावडे ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. राष्ट्रवादीने ११ पैकी ८ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर ताबा मिळाला आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे थेट सरपंच निवडणुकीतही भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तनचे प्रवीण बाळासाहेब जगदाळे यांनी १४१ मतांनी विजय मिळविला. दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या वर्चस्वातील ग्रामपंचायत राष्ट्रवादीने मिळविल्याने थोपटे गटाला धक्का बसला आहे.

भोलावडे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठी लोकांमधून झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भैरवनाथ परिवर्तन पॅनलचे प्रवीण बाळासाहेब जगदाळे यांना (१०६८ मते ) मिळवून १४१ मतांनी विजय मिळविला, तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे वैभव सत्यवान आवाळे यांना (९२७ मते ) मिळाली, तर १२ मते नोटाला गेली. यामुळे भोलावडे ग्रामपंचायतीत परिवर्तन होऊन ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

ही निवडणूक सत्ताधारी विठ्ठल आवाळे गटाच्या पॅनलला आत्मपरीक्षण करायला लावणारी, तर विरोधी परिवर्तन पॅनेलचा विश्वास वाढविणारी ठरली आहे. निकालानंतर परिवर्तन पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी भोलावडे गावात जाऊन मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर गावातून मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला.

दत्तात्रय जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार, कंसात मते-

प्रभाग क्रमांक १: मनोज एकनाथ मोरे (४०७ ), रेश्मा मंगेश आवाळे (३९३ ).

प्रभाग २: ज्ञानेश्वर पांडुरंग तारू (२६६), प्रशांत शशिकांत पडवळ (२५७), पुष्पा दिलीप आवाळे (२७७).

प्रभाग ३: अविनाश विष्णू आवाळे (३०१), भाग्यश्री रोशन सावंत (२६५).

प्रभाग ४ : गणेश जगन्नाथ आवाळे (१४६).

भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे ३ विजयी उमेदवार

प्रभाग १: रूपाली तुकाराम इभाडे (४००), वैशाली विश्वनाथ आवाळे (२१६).

प्रभाग ४ : शुभांगी अजय रणखांबे (१४६).

मासेमारी करणारा तरुण झाला ग्रामपंचायत सदस्य

भोलावडे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधून भैरवनाथ परिवर्तन पॅनेलचे ज्ञानेश्वर पांडुरंग तारू यांनी (२६६ मते), तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे बाळासाहेब नामदेव कुंभार यांना (२१३ मते) मिळाली आणि उद्योजक असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासो कुंभार यांचा ५३ मतांनी पराभव करून ज्ञानेश्वर तारू जायंटकिलर ठरला आहे.

भोलावडे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन करून सत्ता आमच्या हातात सत्ता दिली आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावातील पिण्याच्या पाण्याचा कचऱ्याच्या प्रश्नासह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रवीण जगदाळे, नवनिर्वाचित सरपंच.

 

किवतच्या पहिल्याच निवडणुकीत तानाजी चंदनशिव सरपंचपदी

भोलावडे ग्रामपंचायतीतून किवत विभक्त झाले आहे. त्यामुळे किवत ग्रामपंचायतीची ही पहिलीच निवडणूक होती. या ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी चंदनशिव यांनी २६० मते मिळवीत विरोधी रामचंद्र चंदनशिव यांच्यावर १७ मतांनी विजय मिळविला. रामचंद्र चंदनशिव यांना २४३ मते मिळाली, तर अजित चंदनशिव यांना १५५, तर मंगल चंदनशिव यांना २१ मते मिळाली.

विजयी उमेदवार

प्रभाग एक : अक्षय यशवंत चव्हाण (१३४ ), संगीता गोरक्ष बदक (१६१), पायल शरद बोडके (१५०).

प्रभाग दोन : प्रल्हाद रामचंद्र चंदनशिव (१०५).

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरcongressकाँग्रेसgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस