शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आंदोलनाला फूस

By admin | Updated: June 12, 2017 01:12 IST

अनेक वर्षे सत्ता भोगूनदेखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाहीत. सर्व सहकारी संस्था याच पक्षाच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : अनेक वर्षे सत्ता भोगूनदेखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाहीत. सर्व सहकारी संस्था याच पक्षाच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. तरीदेखील दुधाच्या दराचा प्रश्न सोडविता आला नाही. झालेल्या निवडणुकांमध्ये सतत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सहानुभूती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भावनिक मुद्दा केला जात आहे. हा शेतकऱ्यांचा नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन होते, तर शिवसेना सत्तेत असतानादेखील ‘डबल ढोलकी’प्रमाणे वागत आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केली. कर्जमाफीला सरकारचा विरोध नाही मात्र, सत्ता जेव्हा आली तेव्हा तिजोरीत खडखडाट काँग्रेस, राष्ट्रवादीने केला होता. गरीब शेतकऱ्यापासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होईल. परंतु, सुरुवातीला गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल, यावर सरकार विचार करत आहे, असे कदम यांनी सांगितले. कदम यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न आमचा आहे. दलालाकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी थेट शेतमालाची विक्री सुरू केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनांतून ११ हजार गावे दुष्काळमुक्त केली. मात्र, ज्यांनी सिंचनाच्या नावाखाली राज्याची लूट केली, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकरी आत्महत्येचे पाप आमच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केले आहे. वास्तविक त्यांनी अनेक वर्षे सत्ता भोगली परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते, हे पाप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची भूमिका सतत दुटप्पी आहे. ‘डबल ढोलकी’प्रमाणे ते वागत आहेत, असा टोला त्यांनी मारला. या वेळी भाजपाचे बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, यशपाल भोसले, रामदास दिवेकर, ज्ञानेश्वर कौले, राजेश कांबळे, प्रवीण आटोळे आदी प्रमुख उपस्थित होते.