शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Police Recruitment: मेगा पोलीस भरती प्रक्रियेत ‘नॉनक्रिमीलीयर’बाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 17:27 IST

उमेदवारांची शुध्दीपत्रक काढण्याची मागणी

बारामती : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी १८ हजार ३३१ पोलीस शिपाई पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रक्रियेत कागदपत्राबाबतची नॉनक्रिमीलीयर प्रमाणपत्र १  एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षातील असावे. अन्यथा निवड रद्द केली जाईल,अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्यावर्षीचे कागदपत्रे कशी काढावीत. यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोधळ निर्माण झाला आहे, तरी शासनाने तत्काळ नॉन क्रिमीलीयर च्या मुदतीमध्ये बदल करून शुध्दीपत्रक जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

मेगापोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई १४ हजार ९५६ पदे, पोलीस वाहन चालक २१७४ पदे तर सशस्त्र पोलीस शिपाई (एसआरपीएफ) १२०१ पदे अशी एकूण १८३३१ पदांची मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू जाली आहे. ही आतापर्यंतची महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती प्रकिया आहे. या भरतीमध्ये मुंबईला सर्वाधिक ७०७६ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. नव्याने निर्माण जालेल्या मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रिया होत आहे.

महाराष्ट्रामध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार होती. परंतु वयवाढीच्या मुद्यामुळे ही भरती प्रक्रिया काहीशी पुढे ढकलण्यात आली, तद्नंतर उमेदवारांना २ वर्षांची वय वाढ देण्यात येऊन ही भरती प्रक्रिया ९  नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची ९ ते  ३० नोव्हेंबर पर्यंत २१ दिवस असणार आहे. पोलीस शिपाई पदासांठी प्रथम ५०  गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा, त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११०: प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे.  अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.

बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की,  दरवर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस प्रशासनाकडून काहीतरी त्रुटी रहात असतात. यावर्षीच्या भरतीप्रक्रियेतही कागदपत्राबाबतची एक सूचना देण्यात आली आहे व त्यामध्ये नॉनक्रिमीलीयर प्रमाणपत्र १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वषार्तील असावे, अन्यथा निवड रद्द केली जाईल. अशी सूचना दिल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोधळ निर्माण झाला आहे, की आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्यावषीर्चे कागदपत्रे कशी काढावीत. तरी शासनाने तत्काळ नॉन क्रिमीलीयर च्या मुदतीमध्ये बदल करून शुध्दीपत्रक जाहीर करावे,अशी मागणी रुपनवर यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसexamपरीक्षाEducationशिक्षणSocialसामाजिकBaramatiबारामती