शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

अर्थशास्त्राच्या पेपरला गोंधळ

By admin | Updated: May 10, 2015 05:15 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेतल्या जात असलेल्या प्रथमवर्ष एम.ए.अभ्यासक्रमाच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेतल्या जात असलेल्या प्रथमवर्ष एम.ए.अभ्यासक्रमाच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे शनिवारी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांनी या संदर्भात विद्यापीठाकडे तक्रार केली. त्याचप्रमाणे काही परीक्षा केंद्रांवर सुमारे एक तास उशिराने प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली, अशी चर्चाही केली जात होती. परंतु, सर्व बाबींवर येत्या सोमवारी परीक्षेशी संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘पेपर सेंटरने परीक्षा विभागाकडे दिलेली प्रश्नपत्रिका परीक्षा विभागाने नियोजित वेळेत परीक्षा केंद्रांवर पाठविली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका उशिरा दिली गेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्यात आले होते का? याबाबत विद्यापीठातर्फे चौकशी केली जात आहे. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याबाबत विद्यापीठातर्फे काळजी घेतली जाणार आहे. येत्या सोमवारी दुपारी २ वाजता परीक्षा मंडळाचे अध्यक्ष, संबंधित विद्याशाखेचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचा अध्यक्ष व पेपर सेटर यांची बैठक होणार आहे. त्यामुळे नेमकी कोणती व कोणाकडून चूक झाली ही बाब समोर येईल. त्यासंदर्भातील अहवाल कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल.