शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 14:52 IST

दोन वेळा रद्द झालेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणची (म्हाडा) ५६५ पदांची सरळसेवा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे

अभिजित कोळपे

पुणे : दोन वेळा रद्द झालेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणची (म्हाडा) ५६५ पदांची सरळसेवा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. मात्र, यंत्रणेने यात पुन्हा एकदा गाेंधळ घातला आहे. पुणे केंद्रातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रे दिली आहेत.

एकाचदिवशी सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन सत्रात परीक्षा होणार आहेत. पहिल्या पेपरसाठी सकाळी ८ वाजता केंद्रावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहनव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

म्हाडाची परीक्षा यापूर्वी दोनदा रद्द केली आहे. पहिल्यांदा १२ ते २० डिसेंबर २०२१ यादरम्यान होणार होती. मात्र, ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे लक्षात आल्याने या परीक्षा रद्द केल्या. नंतर त्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान होणार होत्या. मात्र, इतरही परीक्षा याच दिवशी असल्याने म्हाडाच्या परीक्षा रद्द केल्या. त्या आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. मात्र, आरोग्य भरतीप्रमाणेच वेगवेगळ्या जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रे विद्यार्थ्यांना दिली आहेत.

वेळेत पाेहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार

''म्हाडाच्या ५६५ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) वाटप तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. मात्र, पुणे शहरात विविध शाळा, महाविद्यालये उपलब्ध असताना, २००-३०० किलोमीटरची परीक्षा केंद्रे म्हाडाने विद्यार्थ्यांना का दिली आहेत? या सर्व परीक्षा केंद्रांवर वेळेत पाेहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेची कसरत करावी तर लागणारच आहे, तसेच ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, याचा विचार करणे गरजेचे होते असे एमपीएससी समन्वय समिती महेश घरबुडे यांनी सांगितले.''  

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तेथील केंद्रच देण्यात यावे

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू असून तो अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांना सातारा, सांगली, कराड, अहमदनगर या केंद्रांवर वेळेत पोहोचताना अडचणी येणार आहेत. खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. तसेच आदल्या दिवशी त्या-त्या जिल्ह्यात जाऊन हॉटेल, लॉजवर राहणे अनेकांना परवडणारे नाही. त्यामुळे या बाबींचा विचार करून पुण्यातील विद्यार्थ्यांना किंवा संबंधित शहर, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तेथील केंद्रच देण्यात यावे असे विद्यार्थिनी अदिती भोसले हिने सांगितले.'' 

टॅग्स :mhadaम्हाडाexamपरीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षण