शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

विमानतळाच्या हद्दनिश्चितीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 3:09 AM

२ हजार ६४७ हेक्टर क्षेत्र शिल्लक; ‘त्या’ ७ गावांतील अधलेमधले गट घेतल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ

वाघापूर : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजुरीच्या जवळपास सर्व प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्याबरोबरच या विमानतळासाठी एकूण किती क्षेत्र लागणार असून कोणत्या गावातील किती गट नंबरपासून हद्द सुरू होते, हेसुद्धा नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, संबंधित गट नंबरनुसार येण्याऐवजी अधलेमधले असल्याने प्रकल्पबाधित क्षेत्रातील शेतकरी पूर्णपणे गोंधळून गेले आहेत.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या ७ गावांमध्ये हा विमानतळ प्रकल्प होत आहे. या सर्व गावांचे एकत्र मिळून २,८३२ हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित केले जाणार आहे. परंतु, आतापर्यंत प्रत्येक गावाचे एकूण क्षेत्र व प्रकल्पासाठी लागणारे क्षेत्र यांची आकडेवारी तसेच प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यांमध्ये मोठी तफावत असल्याने नक्की किती क्षेत्र जाणार, याबाबत सर्वसामान्य शेतकरी साशंक होता. तसेच, शासनाने केवळ गावठाण वगळण्याचा निर्णय घेतल्याने आपले कसे होणार, याची चिंता शेतकºयांना सतावत होती.परंतु, या ७ गावांचे एकूण क्षेत्रफळ अथवा एकूण क्षेत्र पाहिल्यास ५,४७९. ११ हेक्टर इतके क्षेत्र आहे. तसेच, विमानतळ प्रकल्पासाठी त्यातील २,८३२ हेक्टर इतके क्षेत्र गेल्यास २,६४७. ११ हेक्टर इतके क्षेत्र शिल्लक राहत आहे. यामध्ये वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांतील शासकीय अथवा गायरान जमीन जात नाही; मात्र उर्वरित गावांचे क्षेत्र समाविष्ट होत आहे. शासकीय जमीन सामविष्ट आहे.गट नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत; परंतु ते लागोपाठ आले नसून जाहीर करण्यात आलेले क्षेत्र विमानतळ प्रकल्पामध्ये जाणार की या क्षेत्रापासून पुढील क्षेत्र या जाणार, याबाबत शासनाकडून अधिकृत खुलासा झालेला नाही.त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतामग्न झाले असून आपले कोणते क्षेत्र जाणार की नाही, याबाबत अजूनही साशंक आहेत. त्यामुळे एकत्र संपूर्ण क्षेत्र प्रथम जाहीर करावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.शासनाच्या गट नंबर निश्चितीनुसार आमच्या गावचे जवळपास बहुतेक क्षेत्र या प्रकल्पामध्ये जाणार आहे. परंतु पूर्ण गट नंबर अद्याप समजले नाहीत. तसेच काही गट नंबर मधेच तुटले असल्याने त्यांचा सामावेश होणार किंवा नाही हेही स्पष्ट होत नाही. सध्या तरी या नकाशाच्या कोणतीच दिशा दिसून येत नाही. त्यामुळे आमच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यापुढील काळात संपूर्ण गट नंबर जाहीर झाल्यानंतर सर्वच शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत.- मनीष हगवण,शेतकरी, उदाचीवाडीशासनाने केवळ गावच्या चतु:सीमेवरील गट नंबर दिले असून त्या गटनंबर पासून सर्व क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. जो पर्यंत संपूर्ण क्षेत्र जाहीर होणार नाही. तो पर्यंत कोणाचे किती क्षेत्र जाणार आहे हे स्पष्ट होणार नाही.- संतोष कुंभारकर,शेतकरी, वनपुरीगावठाण वगळणार असे सांगून संपूर्ण क्षेत्र या प्रकल्पात जाणार आहे तर गावठाण वगळून काय उपयोग? गावचा यामुळे काहीच उपयोग होणार नाही, भविष्यात गावठाण क्षेत्र सुद्धा भकास होणार असून आम्हाला गावच सोडून जावे लागण्याची शक्यता आहे.- रवींद्र फुले, शेतकरी, खानवडीअर्धवट गटनंबर जाहीर करून शासन आमची फसवणूक करीत आहे. या गट नंबरला कोणताच अर्थ राहत नाही.- रामभाऊ झुरंगे,शेतकरी, एखतपूर

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळ