शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:34 IST

खडकवासला कालव्याच्या पाण्यावरून कळसला संघर्ष; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कळस : इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या पाण्यावरून संघर्ष उफाळून आला आहे. उन्हाळी हंगामात तीन आवर्तन आवश्यक असताना केवळ दोनच आवर्तने दिली जातात; मात्र यामध्येही पहिल्या आवर्तनात कालव्याचे पाणी टेलला पोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

इंदापूर तालुक्यात आवर्तन काळात वीज बंद केली तर शेतकऱ्यांचे पाइप फोडले. वितरिकांना पाणी सोडण्याचे टाळण्यात आले. काही तासांसाठी केवळ दाखविण्यापुरते पाणी सोडण्यात आले. तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील सिंचन व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कालव्याच्या पाण्यापासून डावलण्यात आल्याचा आरोप कळस (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज हुलसुरे यांच्याकडे केला.

सध्याची पाण्याची गरज ओळखून तातडीने इंदापूरसाठी आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी यावेळी उपस्थितांनी केली. कळस येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात अभियंता पंकज हुलसुरे, शाखा अभियंता श्यामराव भोसले यांनी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी खडकवासला कालवा व वितरिकांच्या आवर्तनाबाबत तक्रारींचा पाढाच वाचला. येथील मुख्य कालवा, त्यावरील ४८, ४९ व ५० क्रमांकाच्या वितरिकेतून पाणी सोडण्यात होणारा दुजाभाव, वितरिकांची दुरवस्था यासह अन्य काही समस्या मांडण्यात आल्या.

इंदापूरकरांच्या वाटणीचे पाणी कमी का झाले? असा सवाल उपस्थितांनी केला. आवर्तन काळात शेतकऱ्यांची वीज बंद केली जाते. कालव्यात आलेले पाणी उपसण्यावर निर्बंध घातले जातात. शेतकऱ्यांचे पाइप फोडले जातात. वितरिकांना केवळ दाखविण्यापुरते तास-दोन तास पाणी सोडले जाते. यासाठी खासगी यंत्रणेची मदत घेतली जाते. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो. वितरिकांना पाणी येत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा अनेक समस्या उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. यावर तातडीने सुधारणा न झाल्यास सिंचन भवन येथे सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी बैठकीत दिला. यावेळी इंदापूर तालुक्याचा सिंचन कालावधी कमी करण्यात आल्याने, पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. वितरिकांच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपये खर्चाची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यानंतर वितरण व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असे स्पष्टीकरण उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.

तलाव भरण्याचे टाळले

क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी कैफियत मांडली. यावेळी मंत्री भरणे यांनी व्हिडीओ काॅलद्वारे सदर तलाव भरण्याची सूचना करत वितरिकांना तीन दिवस आवर्तन देण्याची सूचना केली. मात्र, मंत्र्यांच्या सूचनेनंतरही तलाव भरण्याचे टाळले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपात